कथित वारकऱ्यांच्या बुवाबाजीवर सवाल करणाऱ्या लवांडेना अटक
लवांडे यांनी अटकपूर्व जामिनाच्या अर्जात स्वत:विरोधातील पूर्वी दाखल असलेल्या 4 गुन्ह्यांची माहिती लपविल्याचं समोर आलं. त्यामुळे सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी न्यायालयात आक्षेप घेत लवांडेंच संरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती.


याप्रकरणी आता संताप व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्यातच्या कृतीचा जोरदार निषेध केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जनता प्रश्न विचारतेय की, हिंसेचं हे रक्तरंजीत दुष्टचक्र कधी थांबणार आहे का? एवढ्या घटना सातत्याने आसपास घडत असताना देखील गृहखातं हाताची घडी, तोंडावर बोट अशा अवस्थेत का बसलंय? जनतेला उत्तरं हवी आहेत आणि कठोर कृती देखील. जनता दहशतीच्या छायेखाली असताना गृहमंत्रालय मात्र सुस्त आहे. गुन्हेगारांना फ्री हॅंड द्यायचा आणि दुसरीकडे विकास लवांडे यांच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना सूड भावनेतून अटक करायची, ही कुठली पद्धत? असा प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनता आपल्याकडून न्याय मागतेय.
न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत विकास लवांडे यांना अटकपूर्व जामीन रद्द केला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी तत्काळ विकास लवांडे यांना अटक केली. मात्र दुसरीकडे छत्रपती शिवारायांची बदनामी करणाऱ्या सत्ताधारी समर्थक कथित वारकऱ्यांची गृह खात्याने जराही दखल न घेतल्याबद्दल वारकऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे.
