Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

श्रीरामपूर विभागातील ६८ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई; अपर पोलीस अधीक्षकांचा गुन्हेगारी टोळ्यांना दणका

July 7, 2026

अतिवृष्टीचा इशारा: अकोले तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

July 7, 2026

चंदनापुरी घाटात दरड कोसळली; नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

July 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पीकविमा भरपाई न मिळाल्यास संगमनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन! शेतकरी संघटना व तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांचा इशारा
आंदोलन

पीकविमा भरपाई न मिळाल्यास संगमनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन! शेतकरी संघटना व तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांचा इशारा

शेतकरी संघटनेने आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यामार्फत निवेदन पाठवले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

गत खरीप हंगामामधील पीकविमा नुकसान भरपाई अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये वाटप करण्यात आली आहे. मात्र, संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईतून अन्यायकारक रीतीने वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या २९ मे पर्यंत तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविमा नुकसान भरपाई जमा न झाल्यास, संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

मागील खरीप हंगामात संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिली होती. संगमनेर तालुक्यातही या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु, महसूल व कृषी विभाग प्रशासनाने अंतिम पीक कापणी अहवाल तयार करताना प्रत्यक्ष शेतात न जाता, केवळ टेबलावर बसून हलगर्जीपणे पंचनामे केल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील उंबरठा उत्पादन प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा जास्त दाखविले गेले. जर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे केले असते, तर नुकसानीची खरी आकडेवारी आणि मागील ५ वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी उंबरठा उत्पादन झाल्याचे स्पष्ट झाले असते. अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये उंबरठा उत्पादन कमी नोंदवले गेले असताना, केवळ संगमनेर तालुक्यात ते जास्त दाखविल्यामुळे येथील शेतकरी पीकविमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत.

या अन्यायाविरुद्ध शेतकरी संघटना अहिल्यानगरच्या वतीने ११ मे रोजी जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुधाकर बोराळे यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेने आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यामार्फत निवेदन पाठवले आहे. या निवेदनाद्वारे शासनाला २९ मे पर्यंत पीकविमा भरपाई देण्याची मुदत देण्यात आली असून, तसे न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष रमेश शिंगोटे, जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीताताई वानखेडे, बाळासाहेब घोगरे, सोमेश्वर साबळे, गणपत फटांगरे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 565
अरुण उंडे कृषी विभाग निवेदन नुकसान भरपाई पिक विमा शेतकरी संघटना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्यासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन

July 6, 2026

लोडशेडिंग विरोधात संगमनेरात काँग्रेस आक्रमक; महावितरणवर नागरिकांचा संतप्त मोर्चा

July 4, 2026

२२ लाखांचा बेकायदेशीर खतसाठा जप्त; ‘कृषी गौरव फर्टिलायझर्स’चा परवाना निलंबित, मालकावर गुन्हा दाखल

June 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

श्रीरामपूर विभागातील ६८ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई; अपर पोलीस अधीक्षकांचा गुन्हेगारी टोळ्यांना दणका

By अनंत पांगारकरJuly 7, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  श्रीरामपूर:  अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवरिुद्ध ‘झिरो…

अतिवृष्टीचा इशारा: अकोले तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

July 7, 2026

चंदनापुरी घाटात दरड कोसळली; नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

July 7, 2026

भंडारदरा, मुळा आणि कुकडी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणांमधील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ तर पर्यटनावर बंदी

July 7, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.