अहिल्यानगरमध्ये ५५ बालविवाह रोखले, १५ कुटुंबांवर गुन्हे दाखल
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा घटनांची माहिती तात्काळ १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून द्यावी. याशिवाय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा जिल्हा चाइल्ड हेल्पलाइन १०९८ केंद्राशी थेट संपर्क साधून तक्रार नोंदवावी



जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध कायद्याची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असून, महिला व बाल विकास विभागाच्या वतीने “बालविवाह मुक्त भारत” अभियान मोठ्या जोमाने राबविले जात आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रात कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास किंवा त्याबाबत कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा घटनांची माहिती तात्काळ १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून द्यावी. याशिवाय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा जिल्हा चाइल्ड हेल्पलाइन १०९८ केंद्राशी थेट संपर्क साधून तक्रार नोंदवावी, जेणेकरून अशा कुप्रथांना वेळीच आळा घालता येईल.