वाळूमाफियांच्या विरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय; विशेष कृती दलाची स्थापना आणि माफियांसह दोषी अधिकाऱ्यांवर एमपीडीए
नायब तहसीलदारांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत विधानसभेत आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी ही माहिती दिली.


मुंबई:
गडचिरोली येथे अवैध गौणखनिज तस्करी करणाऱ्यांनी नायब तहसीलदारांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत विधानसभेत आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात महसूल अधिकाऱ्यांना कारवाई दरम्यान मारहाण करणे, अंगावर वाहने घालणे आणि शासकीय वाहनांची तोडफोड करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
अधिकारी आणि तस्करांमधील हे संगनमत समूळ नष्ट करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली असून, अवैध गौण खनिजाचे उत्खनन रोखण्यासाठी आणि अशा प्रकरणांवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठीच स्वतंत्र कृती दलाची स्थापना केली जात असल्याचे महसूलमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.