Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध ‘छात्र भारती’ आक्रमक; शिक्षण मंत्र्यांविरोधात हजारावर विद्यार्थी रस्त्यावर

August 11, 2026

मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 11, 2026

चहा पिण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी आजींच्या गळ्यातील सोन्याची पोत पळवली

August 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध ‘छात्र भारती’ आक्रमक; शिक्षण मंत्र्यांविरोधात हजारावर विद्यार्थी रस्त्यावर
आंदोलन

शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध ‘छात्र भारती’ आक्रमक; शिक्षण मंत्र्यांविरोधात हजारावर विद्यार्थी रस्त्यावर

शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी छात्रवर्तीचे राज्य अध्यक्ष अनिकेत घुले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर: 

राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा ढासळत असून शासन नवीन शिक्षक भरती करण्याऐवजी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असल्याचा घणाघाती आरोप ‘छात्र भारती’ विद्यार्थी संघटनेने केला आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणा विरोधात हजारो विद्यार्थी मोर्चाने रस्त्यावर उतरले होते. यात विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

बदलत्या शैक्षणिक धोरणांविरोधात छात्र भारतीने तीव्र आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून देत त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे.

गेल्या १२ वर्षांपासून राज्यात योग्य प्रमाणात शिक्षक भरती न झाल्यामुळे शिक्षण व्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे. यावर मार्ग काढण्याऐवजी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयांतील ४५ मिनिटांचे तासिकेचे सत्र थेट ४० मिनिटांवर आणले आहे. यामुळे रोज २० मिनिटे आणि आठवड्याला सुमारे २ तासांचे अध्यापन कमी होऊन विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. एवढेच नव्हे तर, विज्ञान शाखेच्या प्रात्यक्षिकांसाठी (प्रॅक्टिकल) पूर्वी असणारी २० विद्यार्थ्यांची तुकडी वाढवून ३५ ते ४० करण्यात येत असून एका शिक्षकावर १२० ते १८० विद्यार्थ्यांची जबाबदारी लादण्यात येत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे गुणवत्तेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेच्या वैकल्पिक विषयांच्या बंद केलेल्या तुकड्या पूर्ववत सुरू कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचा अधिकार अबाधित राहील, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांतील तासिकेचा कालावधी पूर्ववत ४५ मिनिटे करण्यात यावा आणि प्रात्यक्षिकांसाठी विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवून गुणवत्तेची हमी द्यावी.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करता विद्यार्थी, पालक, शिक्षक संघटना व शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष अनिकेत घुले, विशाल शिंदे, राहुल जहाड, उदय पवार, हिरालाल पगडाल, ॲड. समीर लामखडे, कैफ तांबोळी आणि अभिषेक वैराळ यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 129
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी संगमनेरमध्ये चक्काजाम; रस्त्यावर जनसागर उसळला!

August 9, 2026

आमदारकी पणाला लावण्यापासून आमरण उपोषणापर्यंतचा प्रवास; पुणे नाशिक रेल्वे प्रश्नावर आमदारांची भूमिका बदलती राहिल्याचा कृती समितीच्या आरोप! चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

August 8, 2026

हक्काच्या रेल्वेसाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार; नाशिक – पुणे रेल्वेसाठी चक्काजाम होणारच

August 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध ‘छात्र भारती’ आक्रमक; शिक्षण मंत्र्यांविरोधात हजारावर विद्यार्थी रस्त्यावर

By अनंत पांगारकरAugust 11, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर:  राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा ढासळत असून शासन नवीन शिक्षक भरती…

मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 11, 2026

चहा पिण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी आजींच्या गळ्यातील सोन्याची पोत पळवली

August 10, 2026

निसर्गाची मनमोहक उधळण! चंदनापुरी घाटातील प्रवाहित ‘तामकड्या’चे डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते जलपूजन

August 10, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.