महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर जिल्ह्यात 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात न्यायालयीन प्रकरणे आपसात सामंजस्याने मिटविण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे प्रकरणांची यादी सादर करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा आणि जिल्हा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.
भारतीय दंड संहितेच्या फौजदारी प्रसंहिता कलम ३२० प्रमाणे (न्यायालयाच्या परवानगीने) 298, 312, 323, 325, 334, 335, 337, 338, 341, 342, 343, 344, 346, 352, 355, 357, 358, 379, 381, 403, 406, 407, 411, 414, 417, 418, 419, 420, 421, 422, 423, 424, 426, 427, 428, 429, 430, 447, 448, 451 ( चोरीचा गुन्हा वगळता ) 482, 483, 486, 491, 494, 497, 498, 500, 501, 502, 504, 506(1), 508 आणि 509 या कलमातील गुन्हे, लोक अदालतीमध्ये तडजोडीने मिटवता येतील.
अन्य कायदयाच्या अंतर्गत तडजोडपात्र गुन्हयाच्या कलमांखाली प्रकरण दाखल केले असेल तर लोक न्यायालयात तडजोडीसाठी प्रकरण ठेवता येईल. त्यासाठी तक्रारदार, पिडीत आणि आरोपी (ज्याच्या विरुध्द प्रकरण दाखल आहे ती व्यक्ती) आपसांत प्रकरण मिटवू शकतात. त्या प्रकरणांची यादी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत दाखल करता येणार असून या लोक न्यायालयात सहभाग नोंदवून आपण वेळेची व पैशाची बचत होणार असल्याचे श्री.यार्लगड्डा व श्रीमती पाटील यांनी म्हटले आहे.

