महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
राज्यात आता पूर्वीचे सरकार राहिलेले नाही, त्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असेल तर तो नियमात राहूनच करावा लागेल. आधी राज्यांमध्ये गुंडाराज सरकार होते, आता मात्र चांगले सरकार सत्तेवर आल्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिले आहे. आव्हाड यांच्या विरोधात ज्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, त्या संदर्भात अधिक भाष्य न करता त्यांनी याबाबत तिच्याशी बोलेन त्यानंतरच यावर बोलणे उचित राहील असे त्या म्हणाल्या. मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत नाहीये, त्यामुळे कोणते खोटे होणे आता दाखल होणार नाही हे देखील विरोधकांनी लक्षात घ्यावे असे त्यांनी सांगितले.
एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असेल तर तो नियमात राहून केला पाहिजे. थेट कोणालाही मारहाण हा पर्याय असू शकत नाही. एखाद्या चित्रपटाला जर तुमचा आक्षेप असेल तर त्या संदर्भात सेन्सर बोर्डाकडे ते नोंदवायला हवेत. अशा पद्धतीची गुंडगिरी योग्य नाही. कायद्याचे उल्लंघन केले तर मग शासन झालेच पाहिजे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष आवश्यक असतो. खासदार राहुल गांधी यांची भारत जोड यात्रा देशाला मजबूत विरोधी पक्ष देईल. एक सामान्य नागरिक या नात्याने त्यांचे यात्रेला माझ्या शुभेच्छा असल्याचे त्या म्हणाल्या.

