महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान फोन केला असल्याचे ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे.
खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर विविध पक्षाकडून टीका सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील गांधींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. यामुळे विकास आघाडीच्या एकसंघतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
मात्र आता खासदार गांधी आणि खासदार राऊत यांच्यातील फोननंतर महाविकास आघाडीतील घटक असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमधील हे नाते आणखी घट्ट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. 
शिवसेना नेते असलेल्या खासदार संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी अटक केली होती. तीन महिन्याहून अधिक काळ अटकेत राहिल्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर राऊत आणि गांधी यांच्यात फोनवर चर्चा झाली असल्याचे राऊत यांनी ट्विरवरून दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
राऊत म्हणाले, “भारत जोडोत व्यस्त असूनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ११० दिवस यातना दिल्या याचे दुःख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय…”
भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन
माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा
ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय..— Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2022

