महाराष्ट्र संवाद न्यूज
अवैध गौण खनीज उत्खनन आणि वाळू माफीयांवर संपूर्ण राज्यात कारवाई सुरु आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ही कारवाई कोणा एका व्यक्ति आणि पक्षाविरोधात नाही. सरकारने सुरु केलेल्या कारवाईच्या विरोधात अनेकजण आता पत्रकबाजी आणि आंदोलनाचा स्टंट करीत आहेत. ते नेमके कोणाचे समर्थन करीत आहेत, असा सवाल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.
अवैध गौण खनिज आणि बेकायदेशीर वाळू उत्खननाविरोधात सरकारने भूमिका घेतली आहे. त्यामुळे अवैध गौण खनीज आणि बेकायदेशिर वाळू उत्खननावर कारवाई सुरूच राहील असा स्पष्ट इशारा देत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अवैध धंद्यांविरोधात कारवाई व्हावी ही सामान्य माणसाचीच इच्छा होती. अवैध गौण खनीज आणि बेकायदेशिर वाळू उत्खननाबाबत सरकारने सुरु केलेल्या कारवाईमुळे यासर्व बेकायदेशिर व्यवसायाला मोठा लगाम बसणार आहे. शासनाचे दायित्व बुडवून सुरु असलेला हा व्यवसाय आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहायचा का? असा सवाल त्यांनी केला.
अवैध उत्खनन करणाऱ्यांची भूमिका तुम्हाला मान्य आहे का असा सवाल करुन, विखे पाटील म्हणाले की, सरकारने सुरु केलेल्या कारवाईचे या सर्वांनी खरेतर समर्थन केले पाहीजे. मात्र काही लोक विरोध करत आहे अवैध उत्खनन करणाऱ्यांची भूमिका तुम्हाला मान्य आहे का असा सवाल त्यांनी विरोध करणाऱ्यांना केला.
आजपर्यंत राजकीय दबावापोटी कारवाया होत नव्हत्या. प्रशासनाने सुध्दा या अवैध धंद्याकडे डोळेझाक केली होती, प्रशासन सर्व गोष्टी सहन करीत होते. सरकारचे अब्जावधी रुपयांचे दायित्व बुडविले जात होते. महसूल खात्यातील अनेक आधिका-यांवर या माफीयांकडून हल्ले झाले, त्यांना जीवे मारण्याचे प्रकार घडले यासर्व पार्श्वभूमिवर राज्य सरकारने कठोर पाऊल उचलली आहेत. या सर्व बेकायदेशिर उत्खनना विरोधात सरकारची कारवाई सुरुच राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले.
गौण खनीजाच्या कारणामुळे एकही सरकारी काम बंद पडणार नाही, निळवंडे कालव्यांच्या कामासाठी गौण खनीज उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व सुचना व आदेश प्रशासनाने निर्गमित केले आहेत. गौण खनीज उपलब्धतेबाबत सर्व आधिकार प्रांताधिकार्यांना देण्यात आले असून, राज्यात गौण खनीज आणि वाळू संदर्भात सरकार लवकरच धोरण आणून यासर्व व्यवसायामध्ये पारदर्शकपणा कसा येईल असा प्रयत्न करीत असल्याचे मंत्री विखे पाटील सांगितले.

