महाराष्ट्र संवाद न्यूज
प्राधान्य व अंत्योदय कुटूंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी आपले आधारकार्ड ३१ डिसेंबर पर्यंत स्वस्तधान्य दुकानदारांकडे जमा करावेत. अन्यथा अशा शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळण्यात येईल. असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
संगमनेर तालुक्यातील प्राधान्य व अंत्योदय कुटूंब लाभार्थी योजनेच्या शिधा पत्रिकाधारक कुटूंब प्रमुखाचे आधार कार्ड ऑनलाईन प्रणालीमध्ये जोडण्यात आलेले नाही. अशा कुटूंबाच्या याद्या स्वस्तधान्य दुकानादार, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच गावातील व्हाट्सअप ग्रुप वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 
कुटूंब प्रमुख म्हणून घोषीत झालेल्या सदस्याचे आधारकार्ड ऑनलाईन प्रमाणालीमध्ये समाविष्ट झालेले नाही. अशा कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आपले नांव असलेल्या स्वस्तधान्य दुकानदाराकडे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत जमा करावेत. 
मुदतीत आधारकार्ड जमा न केल्यास अशा कुटूंब प्रमुख सदस्याचे आधारकार्ड ऑनलाईन लिंक होणार नाही. त्यामुळे अशा शिधापत्रिका धारकाचे अन्न सुरक्षा योजनेतून नाव वगळण्यात येऊन लाभ बंद करण्यात येईल, असे निकम यांनी सांगितले आहे.

