महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : ‘कुस्तीत दोन मिनिटात खेळ संपतो, परंतु राजकारणात निष्ठा महत्त्वाची असते, दोन दशकात कमावलेले नाव तुम्ही दोन मिनटात गमावले. आम्हा तरुणांना भुलवून आमची फसवणूक केली’ अशी टीका नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर नेटकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र केसरीच्या अभिनंदनच्या ट्विटर पोस्टमुळे सोशल मीडियावर सत्यजित तांबे यांना महाराष्ट्रातील युवकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे.
याबाबतची माहिती अशी की शनिवारी पुण्यामध्ये कुस्ती स्पर्धा झाली त्या स्पर्धेतील विजेत्या मल्लाचे अभिनंदन करताना सत्तेत तांबे यांनी ट्विटरवर “वाह रे पठ्ठ्या ! पहिल्या दोन मिनिटांतच खेळ एकतर्फी करून महाराष्ट्र केसरी मिळवणाऱ्या शिवराज राक्षेचे खूप खूप अभिनंदन! अशी कौतुकाची पोस्ट फोटोसह ट्विट केली.
पदवीधर मतदार संघामध्ये बंडखोरीनंतर राज्यभरात चर्चेत आलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या महाराष्ट्र केसरीच्या या अभिनंदनाच्या ट्विटर पोस्टवर नेटकऱ्यांनी टीकेचा भडीमार केला आहे. एरव्ही समाज माध्यमांमध्ये कौतुकाचा विषय ठरणारे तांबे निवडणुकीतील बंडखोरीमुळे सोशल मीडियात टीकेचे धनी बनले आहे. कोणी त्यांना निष्ठेचे धडे दिले तर कोणी त्यांच्या बंडखोरीमुळे संतापले असल्याचे सोशल मीडियात दिसून आले.
वाह रे पठ्ठ्या!! तू तर देवेंद्र पंताच्या गोड बोलण्याला भुलून स्वतःच्या बापालाच आसमान दाखवलं!! खूप खूप अभिनंदन यासह लढून जिंकलाय पठ्ठ्या….. विरोधकांशी हाथ मिळवणी करून नाही.., वाह रे पट्ठ्या !
महाशक्तीच्या जाळ्यात अडकला म्हणायच का …,फायद्यासाठी विचारसरणी” महत्वाची “नसते ,हे तुमच्याकडून शिकायला मिळाले. अशाप्रकारे नेटकरी तांबे यांच्यावर तुटून पडले असल्याचे दिसते.
सत्यजित तांबे यांनी नेमके काय ट्विट केले होते की ज्यामुळे त्यांना टीकेचे लक्ष बनावे लागले…
वाह रे पठ्ठ्या !
पहिल्या दोन मिनिटांतच खेळ एकतर्फी करून महाराष्ट्र केसरी मिळवणाऱ्या शिवराज राक्षेचे खूप खूप अभिनंदन!#महाराष्ट्रकेसरी #MaharashtraKesari pic.twitter.com/IeWKsntsL4— Satyajeet Tambe (@satyajeettambe) January 14, 2023

