महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
राज्यात सहकार क्षेत्राची ताकद मोठी आहे. महाराष्ट्रातून सहकार क्षेत्र देशभरात पोहोचण्यास मदत झाली. पुढील दशकामध्ये सहकार क्षेत्र मोलाची भूमिका बजावणार आहे. सहकार क्षेत्रावर अन्याय होतो अशी तक्रार नेहमी केली जाते. मात्र आम्ही कर कमी केले असून या तक्रारीत तथ्य नसल्याचा दावा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केला.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा पुण्यामध्ये आयोजित सहकार परिषदेत बोलत होते. शहा म्हणाले, सहकारासाठी विद्यापीठाची निर्मिती करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने सहकार क्षेत्राचे मजबुतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी सहकार मल्टीपर्पज युनिव्हर्सिटी (सहकार विद्यापीठ) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात त्याचे केंद्र असेल. या विद्यापीठातून सहकारी सोसायटी, अकाउंटिंग, बँकिंग, डेअरी, साखर कारखाने, गोदामे आदींसाठी कुशल मनुष्यबळ मिळेल.
यामुळे सहकार क्षेत्रावर अन्याय केला जातो अशा आरोपात तथ्य नाही. सहकार क्षेत्राला पहिल्यांदा टॅक्समध्ये फायदा मिळाला आहे. शिवाय सेंद्रिय शेती करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल निर्यात करायला मोठे अडचण येते. त्यासाठी आम्ही सहकारी तत्त्वावर अशी यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट प्रदेशात आपली भाजी विकता येईल.
याशिवाय 20 टक्के इथेनॉल मिक्स करण्याचं आश्वासन दिलेला असून सध्या आपण 12% इथेनॉल मिक्स करत आहोत याचा कारखान्यांना देखील लाभ होणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

