महाराष्ट्र संवाद न्यूज
अखेर राज्य सरकार नमलं असून अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मोठे यश आलं आहे. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावी लागली.
राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच हत्यार उपसले होते. रायगड किल्ला तसेच मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला.
राज्य सरकारनं साडेपाच तर केंद्रानं गेली साडेचार वर्षे मानधनात कुठलीही वाढ दिलेली नाही. यासह अनेक मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर हा प्रश्न विधानसभेतही उपस्थित करण्यात आला. त्यानंतर अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे. अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवून देण्याबाबत चर्चा झाली आहे.
दरम्यान, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारवर गंभीर आरोप केला होता. अंगणवाडी सेविका 28 जून 2022 पगार वाढ करण्यासाठी फाईल अर्थ विभागकडे पाठवण्यात आली होती. त्यामध्ये 10 हजार वाढण्यासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र, आठ महिन्यांपासून फाईलकडे या सरकाने ढंकूनही पाहिले नाही, असे यशमोती ठाकूर यांनी म्हटले आहे.
अंगणवाडी सेविकांसाठी गोड बातमी
अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे. अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरु केली जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत तातडीची बैठक घेण्यात आली. सेविकांचे शिष्टमंडळ आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्र्याच्या आदेशाने ही बैठक झाली. या बैठकीत आज तोडगा काढण्याबाबत प्रयत्न झालेत. त्यात यशही आले.

