महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर :
आधार धारकांनी आधार नोंदणी केल्यापासून गेल्या दहा वर्षामध्ये एकदाही स्वतःच्या आधारमध्ये कोणतीही दुरुस्ती अथवा अद्यावतीकरण केलेले नाही, अशा आधार धारकांनी आपली माहिती अद्यावत करण्यासाठी गरजेचे असल्याने नागरिकांनी आपली माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या सद्यस्थितीतील अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात 17 लाख 49 हजार 888 आधार धारकांचे आधार माहिती अद्यावत करणे बाकी आहे या आधारधारकांनी स्वतःचे ओळख व पत्त्याचा पुरावा देऊन आधार अद्यावतीकरण करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
नागरिकांना जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन आधार माहितीचे अद्यावतीकरण करावे लागणार आहे. अथवा नागरिकांना स्वतः my Aadhaar Portal द्वारे माहितीचे Online अद्यावतीकरण करता येईल. जे आधार धारक माहिती अद्यावतीकरण (Document Updation) हे myAadhaar Portal https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटद्वारे करतील त्यांना दि. 15 मार्च ते 14 जुन, 2023 या तीन महिन्यांसाठी अद्यावतीकरण मोफत राहील.
अहमदनगर जिल्हयातील सर्व नागरिकांनी वरील दोन पर्यायांद्वारे आपल्या आधार माहितीचे अद्यावतीकरण तातडीने करुन घेण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

