Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोपटपंची करणारे महाविकास आघाडीशी प्रामाणिक आहेत का? जलजीवन योजनेच्या ठेकेदारांवर आमची दहशत राहणार: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
राजकारण

पोपटपंची करणारे महाविकास आघाडीशी प्रामाणिक आहेत का? जलजीवन योजनेच्या ठेकेदारांवर आमची दहशत राहणार: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेरमध्ये ठेकेदार आणि वाळू माफियांना पाठीशी घालण्याचे काम झाले
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 1, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
स्वतःला महाविकास आघाडीचे नेते म्हणून घेणारे सोयीनुसार राजकारण करत आहे. पदवीधर निवडणुकीत त्यांना महाविकास आघाडी आठवली नाही, तेव्हा ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. आत्ताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचा वापर करत पोपटपंची करणारे महाविकास आघाडीशी तरी प्रामाणिक आहेत का? असा सवाल राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत २७ कोटी रुपयांचा नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व एक कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. अध्यक्षस्थानी बापूसाहेब गुळवे होते.

विखे पाटील म्हणाले, सत्ता गेल्याचे दुःख अनेकांना लपवता येत नाही. स्वतःच्या अस्तित्वासाठी महाविकास आघाडीचा उपयोग सुरू आहे. वैफल्य आणि नैराश्याच्या भावनेतून त्यांची पोपटपंची सुरू आहे. अनेक वर्ष केवळ ठेकेदार आणि वाळू माफियांना पाठीशी घालण्याचे काम झाले. संगमनेर तालुक्यात ठेकेदारांना चुका दाखवायला सुरुवात केली तर, त्यांच्या नेत्यांनाच दुःख होऊ लागले आहे. जलजीवन मिशन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या योजनेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कोणत्याही ठेकेदाराची सरकार गय करणार नाही.

महसूल विभागाच्या माध्यमातून आपण वाळूसाठी नवे धोरण आणले आहे. वाळू तस्करी यामुळे पूर्णपणे हद्दपार होईल. सामान्य माणसाच्या दारापर्यंत अवघ्या ६५० रुपयात वाळू देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वी केवळ माफियांनी खिसे भरले. महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनाही या माफियांचा त्रास झाला. सामान्य माणसांचे बळी गेले. त्यामुळे वाळू तस्करीतील गुंडगिरी संपविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शेत शिवार, पानंद रस्ते आणि मोजणीच्या प्रलंबित प्रकरणाबाबतदेखील जलद गतीने कार्यवाही होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे.

शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आता एकाच अर्जावर सर्व प्रकारचे दाखले उपलब्ध होणार असून त्याची अंमलबजावणी येत्या पंधरा दिवसात होईल. जनतेच्या मनातील हे सरकार असल्याने जनतेला जे हवे त्याच प्रकारचे निर्णय आम्ही करत आहोत.

कोरोना संकटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला दिलासा मिळाला. गेल्या अडीच वर्षात राज्यात सरकारचे अस्तित्वही दिसले नाही. जिल्ह्यात मंत्री होते, मात्र एकही मंत्री जनतेपर्यंत गेला नाही. स्वतःची रुग्णालय असताना देखील कोविड सेंटर सुरू करू शकले नाही. असे असले तरी या संकटातून देश आज आत्मनिर्भरतेने उभा आहे. मोदींचे नेतृत्व विश्वव्यापी झाले. सरकारच्या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळत आहे. पिक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर होत्या. या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विम्याचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला. नमो किसान सन्‍मान योजनेच्‍या माध्‍यमातून राज्‍यातील शेतक-यांना १२ हजार कोटी रुपयांची मदत देण्‍याचे उदिष्‍ठ सरकारने ठेवले आहे. विकासाबरोबरच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी सरकारने पाऊले उचलली असून, शेतीपुरक व्‍यवसायातून रोजगार उपलब्‍ध करुन देणार असल्‍याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वसंतराव देशमुख, भाजपाचे तालुका अध्‍यक्ष सतिष कानवडे, शहर अध्‍यक्ष श्रीराम गणपुले, सरचिटणीस जावेद जहागिरदार, भिमराज चत्‍तर, सुदामराव सानप, दिलीप शिंदे, शिवसेनेचे जनार्दन आहेर, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, शरद थोरात, संतोष रोहोम यांच्‍यासह सर्व विभागांचे आधिकारी उपस्थित होते.

○
सरकारने गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. या किटचे वितरण विखे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. जिल्ह्यात आनंदाचा शिधा उपलब्ध झाला असून याचा लाभ सर्वच घटकांना होईल, असे सांगत दिवाळीतदेखील आनंदाचा शिधा घरपोच देत सरकारने ही योजना यशस्वी केल्याचे विखे म्हणाले.

□
जलजीवन मिशन हा पंतप्रधानांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याने सरकारच्या पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. यात ठेकेदारांची जबाबदारी मोठी असल्याने योजनेमध्ये कोणताही गैरप्रकार खपवून घेणार नाही. कोणाला याचे दुःख वाटत असेल तरी, मला त्याची फिकीर नाही. जनतेच्या हितासाठी ठेकेदारांवर आमची दहशत राहील. आमच्या दहशतीची झाकणं उडविण्यापेक्षा तुमच्या कुकरच्या शिट्ट्या आणि झाकणं केव्हाच उडून गेल्याचा टोला विखे यांनी यावेळी लगावला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 446
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मोहसीन शेख | संगमनेर अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली प्रशासनाने हातावर पोट असणाऱ्या…

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.