संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
भारताचे संविधान हे जगातील अतिशय उत्कृष्ट असे संविधान असून मानवतेच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अतिशय मोलाचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत संगमनेर साहित्य परिषदेच्या वर्धापनदिन समारंभात ते बोलत होते. संगमनेर साहित्य परिषदेचा वर्धापनदिन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभदिनी हॉटेल सत्यशिवमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, उपाध्यक्ष मेजर लक्ष्मण ढोले, सचिव दिलीप उदमले, वाचन मंडळ प्रमुख मनोज साकी, प्रकल्पप्रमुख गिरीश सोमाणी, प्रा. शशांक गंधे, प्रा. ज्ञानेश्वर गोंटे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर राक्षे आदी उपस्थित होते.

शशांक गंधे यांनी आपले विचार मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती सांगितली. साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांनी परिषदेच्या कार्याची माहिती सांगत अहवालवाचन केले. यावेळी “खेळ मांडियेला” या नाटकातील कलाकार सुरेश परदेशी, दीपक टाक यांचा तसेच भीमज्योत तरुण मित्र मंडळ, म्हाळुंगे इंगळे (ता. खेड जि. पुणे) तर्फे काव्य गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्द्ल परिषदेचे सहसचिव दर्शन जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
संगमनेर साहित्य परिषदेच्या गणेश सराफ, गिरीश सोमाणी, ललित देसाई, दर्शन जोशी यांचे गीतगायन, स्मिता गुणे यांचे काव्यवाचन तसेच सभासदांतील उखाणे घेण्याच्या चढाओढीने कार्यक्रमात रंगत आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप उदमले यांनी केले. प्रास्ताविक गिरीश सोमाणी यांनी केले. आभार ज्ञानेश्वर राक्षे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संगीता राक्षे, सुवर्णा साकी, श्रेया गंधे, सविता गाडेकर, दीप्ती जोशी, रामनाथ सातपुते, राधिका सातपुते, सुभाष कु-हे, राजेंद्र लगे, स्मिता सोमाणी, विजय दीक्षित, उषा दीक्षित, पद्मा गोंटे, तनुष पठाडे, प्रकाश कोटकर, भारती टाक, रामनाथ वाघ, अजित वैद्य, बाळकृष्ण महाजन, अमोल गवांदे, सुप्रिया गवांदे, यश गाडेकर, प्रियांका पठाडे, सुलभा फडणीस यांची उपस्थिती होती.

