महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर शहरासह परिसरात शुक्रवारी (ता.२८) दुपारी अवकाळी पावसासह तुरळक गारा पडल्या. वादळी वाऱ्याने गुंजाळवाडीच्या आरगडेमळा येथील भाऊसाहेब सोमनाथ आरगडे यांच्या दोन खोल्यांचे पत्रे उडून मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी छोटे वृक्ष छोटे वृक्ष उन्मळून पडले तर फ्लेक्स बोर्ड फाटले होते. साकुरमध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला.
संगमनेर तालुक्याच्या बहुतांशी भागात शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तुरळक गाराही पडल्या. त्यानंतर वादळी वाऱ्याला सुरूवात झाली आणि काही क्षणातच वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने अनेक ठिकाणी छोटे वृक्ष उन्मळून पडले. वादळामुळे फ्लेक्स देखील अस्ताव्यस्त होऊन फाटले होते. शहरालगतच्या गुंजाळवाडी येथे भाऊसाहेब आरगडे यांच्या दोन खोल्यांचे पत्रे थेट उडून हजार ते दिड हजार फुटांवर जावून पडले आहेत. यावेळी खोलीच्या मुंडरीच्या विटाही मोठ्या प्रमाणात खोल्यांमध्ये पडल्या.
त्यामुळे दोन्ही खोल्यांमध्ये असलेल्या संसारोपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान घरातील माणस हे खालच्या खोल्यांमध्ये होते त्यामुळे दैव बलवत्तर म्हणून सर्वच बचावले. दरम्यान वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याची मागणी त्यांनी केली. तुरळक गाराही पडल्याने शेती पिकांनाही चांगलाच फटका बसणार आहे.

