संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
गुणवत्ता व उत्कृष्ट निकालाच्या परंपरेसह यूजीसीचे अनेक मानांकन आणि आयएसओ अवॉर्ड मिळालेल्या अमृतवाहिनी एमबीएच्या 45 विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच चांगल्या पॅकेजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एम. लोंढे यांनी दिली.
डॉ.लोंढे म्हणाले, माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी एमबीएने आपल्या गुणवत्तेचा लौकिक जपला. या महाविद्यालयातून 2286 विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केली आहे. यामधील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे.
यावर्षी विविध कंपन्यांनी संस्थेत येऊन घेतलेल्या कॅम्पस इंटरव्यूमधून 45 विद्यार्थ्यांची चांगल्या पॅकेजवर निवड झाली आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक, विवंता ताज हॉटेल पुणे, लॉग चेक कंपोझिट इंडिया, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सोलुशन, इन्फोसिस लिमिटेड, इन्स्पायर कम्प्युटर्स, एबीके इम्पोर्ट लिमिटेड, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, डेसिमल पॉईंट सोल्युशन, इंडिया मार्ट, संगमनेरच्या मालपाणी ग्रुपसह विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे.
अमृतवाहिनी एमबीएला नॅकचे मानांकन मिळाले असून संस्थेच्या गुणवत्तेमुळे व्यवस्थापन शास्त्रातील पीएचडी संशोधन केंद्र ही कार्यरत असून यामधून 27 विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ग्रंथालय, अत्याधुनिक इमारत, क्रीडांगण, प्लेसमेंट सुविधा, होस्टेल, निसर्गरम्य वातावरण यामुळे संस्थेला विविध पुरस्कारांसह या वर्षीचा ‘बेस्ट इमर्जिंग इन महाराष्ट्र’ हा पुरस्कार देखील मिळाला. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटकामी विभाग प्रमुख डॉ. नितीन भांड यांनी विशेष परिश्रम घेतले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख, इंद्रजीत थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ आदींनी अभिनंदन केले.

