Maharashtra sanvad news
Anant Pangarkar
संगमनेर – अहमदनगरसह नाशिक व पुणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या आणि व्यापाऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून परिचित असलेल्या संगमनेर मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की बँकेची निवडणूक लागणार? याचा आज दुपारपर्यंत अंतिम निर्णय समोर येणार आहे. दरम्यान सत्ताधारी गटाने निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. नव्या जुन्यांचा मेळ साधत सत्ताधारी गटाने आपल्या व्यापारी एकता पॅनलची अंतिम यादी जाहीर केली आहे.
बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाले असून शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. सत्ताधारी गटाच्या काही संचालकांनी दुसऱ्या इच्छुक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी यावेळी उमेदवारी अर्ज भरले नाही. राखीव जागेपैकी एका जागेवरील संचालकाची निवड बिनविरोध झाली असून उर्वरित जागांसाठी निवडणूक लागली आहे. तर सत्ताधारी गटासोबतच काही विरोधी उमेदवारांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. निवडणूक टाळण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांशी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असले तरी शुक्रवारी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. उर्वरित विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्यास बँकेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मात्र विरोधी उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्यास निवडणूक अटळ आहे. त्यामुळे विरोधी उमेदवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
या संदर्भात सत्ताधारी व्यापारी एकता पॅनलचे प्रमुख उद्योगपती राजेश मालपाणी यांनी देखील आवाहन केले असून ते म्हणाले, संगमनेर शहराच्या आर्थिक संस्था अधिक उत्तम व एकदिलाने पुढे नेण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या संगमनेर मर्चंट बँकेसाठी गट तट बाजूला ठेऊन जुन्या अनुभवी व नव्या उत्साही सदस्यांची सर्व समावेशक टीम करण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला आहे.
सर्व इच्छुकांचे समाधान शक्य झाले नसले तरी निवडणूका बिनविरोध होतील यासाठी त्यांनाही सहकार्याची व अर्ज मागे घेण्याची विनम्र प्रार्थना आहे. मोठ्या मनाने अर्ज मागे घेतलेल्या सर्व उमेदवारांना सादर धन्यवाद. सर्वांची साथ मिळाली तर आपल्या बँकेचाही नवीन इतिहास निश्चित घडेल. कृपया आपला बहुमूल्य आशीर्वाद द्यावा.
व्यापारी एकता पॅनलचे जाहीर झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे :-

