महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – तालुक्यातील सायखिंडी येथील ग्रामीण भागातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. मनोहर बाबा विद्यालयात सोमवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व प्रबोधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संदीप सातपुते होते.
यावेळी वनरक्षक जयश्री श्रीमती पवळे यांचे प्रमुख व्याख्यान झाले, वृक्षारोपण व संवर्धन केल्यास आपला भविष्यकाळ उज्ज्वल असेल, कोरोना महामारीत लोकांना प्राणवायूचे महत्व समजले. झाडे जगली तरच माणसं जगतील म्हणून झाडांची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक सातपुते यांनी शाळेला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते मिळाला असल्याची माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर वनरक्षक गिताराम गोर्डे, अशोक चारुडे, दिपक शिरतार, राजेश गायकवाड, इयत्ता दहावी व इयत्ता पाचवीचे विद्यार्थी उपस्थित होते.

