महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – लव्ह जिहाद सारख्या वाढत्या घटनांसह विविध अत्याचारा विरोधात संगमनेरमध्ये हिंदू समाज एकवटला होता. अभूतपूर्व असा भव्य भगवा मोर्चा मंगळवारी सकाळी संगमनेरमध्ये काढण्यात आला. मोर्चाला हजारोंची उपस्थिती होती. यात महिला तरुणींची संख्या देखील लक्षणीय होती. याच बरोबरीने संगमनेर शहर आणि तालुक्यात आज स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला. मोर्चानंतर देखील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय विविध आस्थापना बंदच होत्या.

मंगळवारी सकाळी नगरपरिषदेसमोरून या भव्य भगवा मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा ज्यावेळी नवीन नगर रस्त्यावरील प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला त्यावेळी त्याचे दुसरे टोक बाजारपेठेत होते. यावरून उपस्थितीचा अंदाज येतो. 25 ते 30 हजारावर नागरिक या मोर्चात सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. मोर्चातील जय जय सियाराम, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी संगमनेर दणाणून गेले होते. समाजाच्या सर्व स्तरातील व सर्वपक्षीय लोक या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.
मोर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एसआरपी, दंगल नियंत्रण पथक आदींसह विविध पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. याशिवाय अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.
देशभरातील लव्ह जिहाद सारख्या वाढत्या घटना, धर्मांतराचे प्रकार याशिवाय गेल्या आठवड्यात संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील आठ हिंदू तरुणांवर धारदार शस्त्रांचा वापर करत झालेला प्राणघातक हल्ला यामुळे समाजामध्ये रोशाचे वातावरण निर्माण झाले होते. या विरोधात मंगळवारी संगमनेरमध्ये निघालेला मोर्चा लक्षवेधी ठरला आहे. केवळ संगमनेर मधीलच नव्हे तर आसपासच्या गावांमधील लोक देखील या मोर्चात सहभागी झाले होते. तसेच नागरिकांनी स्वयंस्पर्तीने पाळलेल्या बंदला देखील अत्यावश्यक सेवेचा अपवाद वगळता 100% प्रतिसाद मिळाला.
मोर्चा नवीन नगर रोड रस्त्यावरील प्रांताधिकारी कार्यालयावर आल्यानंतर येथे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय प्रमुख शंकर गायकर आणि दिल्लीतील सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके यांची भाषणे झाली.
चव्हाणके यांनी आपल्या भाषणात संगमनेर, श्रीरामपूर आणि बीड ही लव्ह जिहादची प्रमुख केंद्रे झाले असल्याचे सांगत येथे वीस मिनिटात तीन केसेस समोर आल्या. देशभरात एक कोटीहून अधिक मुली या लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. त्यामुळे या विरोधात कडक कायदा आणण्याची गरज आहे. कोणत्याही पक्षात रहा मात्र, हिंदू म्हणून एक रहा. ती आज काळाची गरज बनली आहे. संगमनेरमध्ये लव्ह जिहाद बरोबरच धर्मांतराचे प्रकार सुरू आहेत. या जिहाद्यांचा सर्व खर्च कसायांकडून भागविला जात असल्याने येथील अनधिकृत कत्तलखाने बंद झाले पाहिजे गाईंच्या कत्तलीसाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरेल असा कायदा आणला पाहिजे. गड किल्ल्यांवरील मदारी, मदरशे काढून टाका. साडेअठरा टक्के लोकसंख्येने असलेले मुस्लिम या देशात अल्पसंख्यांक कसे ठरतात असा सवाल करत भारत हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी त्यांनी केली.

