महाराष्ट्र संवाद न्यूज
मित्रा….!!!
‘ते’ भडकवतील ,
तुला राहावणार नाही ,
तरीही जागचा हलू नकोस ,
तुला शपथ आहे पुस्तकांची ,
तू दगड उचलू नकोस !!
धर्म कधीच संकटात नसतो,
तुझा ही धर्म धोक्यात नाही,!
कुण्या भुरट्यांमुळे तुझ्या आदर्शांचा अपमान होत नाही,!!
कर बळकट भावनांना,
वारंवार दुखू देवू नकोस,!
कर दुर्लक्ष थोड इकडं तिकडं लक्ष देऊ नकोस,!!
तुझ स्वतःच मत असावं,
दुसऱ्याने पढवलेल बोलू नकोस,!
तुला शपथ आहे पुस्तकांची,
तू दगड उचलू नकोस !!
दोनेक वर्षा नंतर ,
सुटेल सारं कोड !
निवडणुका जवळ आहेत ओळखून घे थोडं !!
हे बघ ही सर्व मतांची समीकरणं आहेत !
एका आड एक दडलेली राजकारणं आहेत !!
अन्यथा तुला सल्ला ही फुकट देणार नाहीत !
पोराला करतील उभा तुला तिकीट देणार नाहीत!!
निवड स्वतःचा रस्ता ,
त्यांच्यासोबत चालू नकोस ,
तुला शपथ आहे पुस्तकांची, तू दगड उचलू नकोस .
तू बाह्या मागे सारल्या तर , वातावरण टाईट होईल!
चांगलं काही काहीच नाही , झालं तर फक्त वाईट होईल!!
कुणी मुकेल कुंकवाला अन् कुणी शेवटच्या पाण्याला!
सल्या जाईल आत आणि जामीन होणार नाही गण्याला!!
हा तिढा ताणल्याने तुझी कोणतीच समस्या सुटणार नाही!
पेट्रोल स्वस्त आणि गॅसला वाढीव सबसिडी भेटणार नाही !!
शांत डोक्याने विचार कर , उगाच नाकाने वांगी सोलु नको !
तुला शपथ आहे पुस्तकांची ,
तू दगड उचलू नकोस ,
तू दगड उचलू नकोस !!
(अनामिक – साभार समाज माध्यम)
अशा समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे महाराष्ट्र संवाद न्यूज आपणास सकारात्मक आवाहन करत आहे

