Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हरिश्चंद्रगड अभयारण्यात ‘या’ राज्यप्राण्याच्या संख्येत मोठी वाढ : नाशिक वन्यजीव विभागाने केली प्रगणना
महाराष्ट्र संवाद विशेष

हरिश्चंद्रगड अभयारण्यात ‘या’ राज्यप्राण्याच्या संख्येत मोठी वाढ : नाशिक वन्यजीव विभागाने केली प्रगणना

दिलासादायक...
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 16, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अकोले | राजेंद्र जाधव 

महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ओळख असलेले ५४ शेकरू हरिश्चद्रगड अभयारण्यात आढळून आले यात यात प्रामुख्याने कोथळे, पाचनई, आंबित, कुमशेत या परिसरातील जंगलात त्यांचे वास्तव्य असल्याचे समोर आले.

तर पंधरा दिवसांच्या प्रगणनेत अकोले तालुक्यातील राजूर -हरिश्चंद्रगड अभयारण्यात शेकरुंची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याचे प्रगणनेत दिसून आले वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्याकडुन या शेकरूंची मोजतात करण्यात आली. मोजणी दरम्यान ५४ शेकरूनी वन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षरीत्या दर्शन दिले.

राजूर वनरिश्रेत्रात येणाऱ्या तीन वनपरिमंडळातील जंगलात ही प्रगणना राबविण्यात आली. नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीतील अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य हे शेकरुच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी राजूर, भंडारदरा वनपरिक्षेत्रांमध्ये शेकरुच्या प्रगणनेचा उपक्रम वन्यजीव विभागामार्फत राबविला जातो.

उपवनसंरक्षक राजेंद्र हिरे, सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या आदेशान्वये राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे यांच्या पथकातील वनपाल शंकर लांडे, हनुमंता इदे, नवनाथ गांगोडे, श्रीमती खाडे, वनरक्षक गोविंद आधार, प्रकाश आढळ, वनरक्षक दत्तू डोंबाळे, चंद्रकांत चव्हाण, अविनाश भोये, निलेश पिचड, गंगाराम पालवी, प्रविण साळुंखे यांनी कोंथळे, लव्हाळी, कोतुळ, अंबित, तळे, पाचनई कुमशेत या भागांतील जंगलांमध्ये प्रत्यक्ष दिसणाऱ्या शेकरुसह व त्यांच्या घरट्याचे निरीक्षण केले.

या दरम्यान त्यांना ५४ शेकरु आढळून आले. तर चांदा, करंबु, आळीव, करप, जांभूळ हिरडा, कोभोळ, आवळा, उबर, येहळा, गेळ, शंदरी, लोध, गुळचाई, पिंपर, अशिद, लांद, आंबा या झाडांना शेकरूंची पसंती असल्याचे पुढे आले. एकूण १७ देवरायांचे संवर्धन आदिवासीच्या मदतीने केले जात असून, शेकरूंचे या ठिकाणी वास्तव्य आहे. तसेच या वर्षी अभयारण्यात शेकरुनी बांधलेल्या घरट्याची संख्या २६० आढळून आल्याने नवीन घरट्यांची संख्या वाढलेली दिसून आली.

जुने १८५ घरटे आढळून आली. तर ६१ घरटे सोडून दिल्याचे समोर आले आहे. गतवर्षी सोडलेल्या जुन्या घरट्याचा आकडा जास्त होता. मात्र यावर्षी वापरात असलेल्या जुन्या घरट्याचा आकडा त्या तुलनेत जास्त असून ही दिलासादायक बाब मानली जात आहे. यामुळे शेकरुचा या अभयारण्य अधिवास समृद्ध होत असल्याचे मानले आहे. गेल्या वर्षी प्रत्यक्षरित्या केवळ ४७ शेकरु दिसले होते.

अशी झाली शेकरुची प्रगणना

अकोले तालुक्यातील राजूर-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील झाडाना क्रमांक देऊन झाडावर क्रमांक टाकण्यात आला. तसेच जीपीएस रीडिंग घेत शेकरुच्या त्या झाडावरील अधिवासाबाबतचे निरीक्षण वनपाल, वनरक्षक, वनमजूरांकडून नोंदविण्यात आले. राजूर वनपरिक्षेत्रातील तीनही वनपरिमडाळात सुमारे दहा ते पंधरा दिवस गणना घेण्यात आली. पाच घरटे म्हणजे एक शेकरूचे वास्तव्य याप्रमाणे मोजदाद केली गेली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 981
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

By अनंत पांगारकरJuly 22, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर…

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

July 22, 2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.