महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – राज्यात दररोज मोठ्या संख्येने मुली आणि महिला बेपत्ता होत आहेत. “राज्यातल्या महिला झाल्या बेपत्ता, सरकारला नाही पत्ता” अशी सध्या स्थिती असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी गेल्या पाच महिन्यात म्हणजेच जानेवारी ते मे राज्यात किती मुली आणि महिला बेपत्ता झाल्या याबाबत गेल्या आठवड्यात सभागृहात धक्कादायक माहिती दिली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस आहे. राज्यातून मुली आणि महिला मोठ्या संख्येने बेपत्ता होत आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी आज सभागृहात सांगितले की, जानेवारी 23 मे 23 या पाच महिन्याच्या कालावधीत राज्यातून 19533 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.
आता मात्र शासनाच्या माध्यमातून समोर आलेल्या आकड्यानुसार ही संख्या मोठी आहे. पाच महिन्यात 19 हजार 533 महिला मुली गायब झालेले असल्याने राज्याच्या गृह विभागाने या संदर्भात दखल घेऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच यासंदर्भात सभागृहाला देखील माहिती देणे आवश्यक असल्याचे देशमुख म्हणाले.
राज्यातील बेपत्ता होणाऱ्या महिला व मुलींची संख्या अत्यंत धक्कादायक आहे. जानेवारी २०२३ ते मे २०२३ पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात ५६१० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी मार्च महिन्यात जवळपास २२०० जणी बेपत्ता झाल्यात. महाराष्ट्रात दररोज सरासरी ७० महिला बेपत्ता होत आहेत.… pic.twitter.com/eiDiSwcJ6x
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 18, 2023
19 जुलैला देशमुख यांनी महिला आणि मुली बेपत्ता होत असल्याचा मुद्दा सभागृहात मांडला होता. त्यावेळी 6 हजार 510 एवढा बेपत्ता महिला मुलींचा आकडा होता. सध्या समोर आलेली आकडेवारी बघता राज्यात सरासरी दररोज 70 महिला-मुली बेपत्ता होत आहेत. पुणे शहरात महिला-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मार्चमध्ये राज्यात भविष्य महिला मुली बेपत्ता झाल्या असल्याचे देशमुख म्हणाले.

