महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याला तातडीने अटक करावी, अशी मागणी करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस व विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने भिडे गुरुजीच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
संगमनेर बस स्थानक येथे संभाजी भिडे विरोधात काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सौ. दुर्गाताई तांबे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, निखिल पापडेजा, नितीन अभंग, दिलीप जोशी, गजेंद्र अभंग, सुरेश थोरात, जावेद शेख, पद्मा थोरात, अर्चना बालोडे, सुनंदा जोर्वेकर, संतोष हासे, संपत डोंगरे, गणेश मादास, दत्तू कोकने, सुरेश झावरे, नवनाथ आंधळे, अनिकेत घुले आदींसह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांच्याविरोधात घोषणा देत तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
बाबा ओहोळ म्हणाले: राष्ट्र पुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी संभाजी भिडे हे काही बेताल वक्तव्य करत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, साईबाबा, महात्मा फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. या माणसाला तातडीने अटक करून कडक शिक्षा करावी.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या: एका बाजूला मनिपुर जळते आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातही शांतता भंग करण्यासाठी भिडेसारख्या व्यक्ती बेताल वक्तव्य करत आहेत. महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी काही विचारसरणीचे लोक द्वेषभावना निर्माण करत आहेत. अशांना जरब बसवण्यासाठी तातडीने अटक करावी.
मिलिंद कानवडे म्हणाले: भाजपा व आरएसएस विचारसरणीच्या लोकांना राष्ट्रपुरुषांबद्दल आदर आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यांनी भिडेंना पाठीशी न घालता तातडीने गुन्हा दाखल केला पाहिजे.
सुरेश थोरात म्हणाले: संभाजी भिडे यांनी साईबाबा विरुद्ध बेताल वक्तव्य केले आहे. विद्यमान पालकमंत्री शिर्डी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असून पालकमंत्री व खासदारांनी तातडीने भिडे विरुद्ध निषेध करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करायला हवी होती मात्र साईबाबांविरुद्ध बेताल वक्तव्य होत असताना त्यांनी गप्प राहणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले.
यावेळी सोमेश्वर दिवटे, अनिकेत घुले आदींनी निषेध व्यक्त केला. याप्रसंगी के. के. थोरात, संजय कोल्हे, उबेद शेख, विष्णुपंत रहाटळ, विजय उदावंत, विजय राहणे, भास्कर शरमाळे, गणपतराव सांगळे, अंबादास आडेप, आनंद वर्पे, जयराम ढेरगे, भाऊसाहेब शिंदे, मिनानाथ वर्पे, माणिक यादव, शिवाजी जगताप, गौरव डोंगरे, आदिसह विविध संघटनांचे पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे भारताची जगात ओळख – डॉ. तांबे
राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे भारताची जगात ओळख झाली आहे. लोकशाहीला ताकद देणाऱ्या पुरोगामी विचारांचे असणाऱ्या गांधीजींनी सातत्याने देशाच्या एकात्मतेसाठी काम केले असून पुढील पिढ्यांना विचार दिला आहे. त्यांच्याच विचारावर देशाची वाटचाल सुरू असून काही विकृत प्रवृत्तीकडून होणाऱ्या या अवमानकारक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे.


