Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गावाहिनी-मातृशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि दिव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही शोभायात्रा रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता संगमनेरमधील अभिनवनगर येथील श्रीराम मंदिरातून निघेल. श्रीराम जन्मोत्सव रविवार, ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता साजरा केला जाईल. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व बजरंग दल शाखा, प्रमुख मंदिरे, श्रीराम मंदिरे आणि हनुमान मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. शोभायात्रेत भव्य धार्मिक देखावे, अयोध्येतील श्रीरामलल्लांची भव्य मूर्ती, महाबली हनुमानाची भव्य मूर्ती, केरळमधील पारंपारिक नृत्य आणि वाद्ये, श्रीराम…
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात बुधवारी (दि. २) दुपारी साडेतीन ते पाच वाजेच्या दरम्यान जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील सावरगाव तळ, निमज, धांदरफळ, नांदुरी दुमाला, पेमगिरी आणि कौठे धांदरफळ या गावांना मोठा फटका बसला. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, कौठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गाईंचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, उन्हाळी बाजरी, हरभरा, कांदा आणि चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कौठे धांदरफळ येथे निवृत्ती रखमा घुले यांच्या दोन गाईंवर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून, ओढे-नाले आणि डोंगर कड्यांवरून पाणी वाहत…
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर तालुक्याच्या पठार आणि पश्चिम भागात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या भागातील नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी माजी महसूल आणि कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. हिवरगाव पठार, निमज, नांदुरी दुमाला, सावरगाव तळ, चंदनापुरी मिर्झापूर, धांदरफळ खुर्द या गावांना बुधवारी झालेल्या या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे डोंगर भागातून पाणी वेगाने खाली आले आणि शेतात साचले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसत…
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेरची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमणला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युरोपमध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याकरिता पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. संगमनेर चे आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून मदतीचा हा धनादेश सोमण कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला आहे.संगमनेरची सायकल पटू असलेल्या प्रणिता सोमण हिने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकलिंग मध्ये अनेक बक्षिसे मिळवत देशाचे नाव सर्वत्र उंचावले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी ठरलेल्या प्रणिताचा आमदार अमोल खताळ यांनी नुकताच डॉ. प्रफुल्ल सोमण यांच्या घरी जाऊन सत्कार केला होता. त्यावेळी प्रणिताच्या वडिलांनी युरोपमधील प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याच खताळ यांना सांगितले. खताळ यांनी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
शिर्डी, दि. २ एप्रिल – थोरात कारखान्यापाठोपाठ, आता पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांनी जाहीर केला आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी ९ मे २०२५ रोजी मतदान होणार आहे, आणि १० मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे गुरुवारपासून (३ एप्रिल) ते ९ एप्रिल या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी, शिर्डी यांचे कार्यालय, राहाता प्रशासकीय इमारत (राहाता तहसील कार्यालय) पहिला मजला, राहाता येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील आणि स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता…
शिर्डी, दि. २ एप्रिल – शिर्डीत शनिवारपासून (दि. ५) ते सोमवार (दि. ७) या काळात श्री साईबाबा संस्थानतर्फे ११४ वा श्रीरामनवमी उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, १ लाख ७३ हजार भक्तमंडळ सभासदांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या उत्सवात मुंबईच्या व्दारकामाई मंडळाने श्री गजमुख गणपतीचा देखावा सादर केला असून, मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सौदी अरेबियातील एका साईभक्ताने फुलांची सजावट केली आहे. उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उत्सवात विविध ठिकाणच्या ८७ पालख्या सहभागी होणार आहेत.…
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी राजहंस दूध संघाच्या ‘मिशन ५० लिटर’ उपक्रमाअंतर्गत कालवड संगोपन कार्यशाळेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी दूध संघाची स्थापना केली, आज तालुक्यात ९ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन होण्यासाठी राजहंस दूध संघाचा ५० लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गाई निर्माण करण्याचा उपक्रम दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी ५० लिटर दूध निर्मिती करणाऱ्या नवीन कालवडी आणि गाईंचे प्रदर्शन झाले. मिशन ५० लिटर अंतर्गत कालवड संगोपन योजना कार्यशाळेत थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते.…
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी सहकाराचे मोठे वलय लाभलेल्या संगमनेर तालुक्यात पतसंस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात भक्कमपणे विणले गेले आहे. या पतसंस्थांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल तालुक्यात होत असते. घुलेवाडी येथील स्वातंत्र्य सैनिक भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने मावळत्या आर्थिक वर्षात मोठे यश मिळविले आहे. संस्थेने आर्थिक वर्षांमध्ये १३ कोटी १२ लाख ६२५ रुपयांची उलाढाल करत ९ लाख ११ हजार रुपयांचा नफा मिळवला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मावळत्या आर्थिक वर्ष अखेर पतसंस्थेकडे १० कोटी ४८ लाख ४० हजार ३०३ रुपयांच्या ठेवी असून, ८ कोटी २३ लाख ५८ हजार ७०० रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच…
संगमनेर, दि. १ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेरमधील टोमॅटो व्यापारी भाऊसाहेब शंकर मेहेत्रे यांची राजस्थानमधील ललित रामचंद्र चंदावनी या टोमॅटो व्यापाऱ्याने सुमारे १९ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी चंदावनी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब मेहेत्रे यांनी संगमनेरमधून टोमॅटो खरेदी करून ते राजस्थानमधील राम ट्रेडिंग कंपनीला (मालक: ललित रामचंद्र चंदावनी, रा. जोधपूर, राजस्थान) वेळोवेळी पुरवले. मात्र, चंदावनीने या टोमॅटोचे पैसे मेहेत्रे यांना दिले नाहीत. त्यामुळे मेहेत्रे यांचे १९ लाख २२ हजार ४३३ रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी भाऊसाहेब मेहेत्रे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ललित रामचंद्र चंदावनी यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर…
संगमनेर, दि. १ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम पुण्याच्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. विधानसभेपाठोपाठ आता संगमनेरमध्ये कारखान्यासाठीच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संगमनेरमध्ये निवडणूक ज्वर बघावयास मिळेल. निवडणूक कार्यक्रमानुसार ११ मे २०२५ रोजी मतदान होणार असून १२ मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात ३ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील व स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११…
