Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर राज्याचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अथक परिश्रम घेऊन आपल्या कार्यकाळात उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील १८२ गावांसाठी वरदान ठरलेले निळवंडे धरण आणि त्याचे उजवा व डावा कालवे पूर्ण केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज रखरखत्या उन्हाळ्यातही दोन्ही कालव्यांना पाणी मिळत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी समाधानी आहेत. परिणामी लाभक्षेत्रातील पाण्याचे टँकरही कमी झाले आहे. थोरात यांच्या दूरदृष्टीमुळेच धरणाच्या लाभक्षेत्रात आज समाधानाचे सुखद वातावरण निर्माण झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी व सिन्नर या तालुक्यातील एकूण १८२ गावांना निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ होतो. ९७ किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्यामुळे २ हजार ३९५ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे, तर ८५ किलोमीटर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई, दि. २६ आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी विमानतळाच्या विकासाला गती दिली आहे. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत त्यांनी शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड आणि आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता दिली. यासोबतच, विमानतळाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी मंजुरी दिली. शिर्डी विमानतळाच्या कार्गो टर्मिनलचे काम जलद गतीने सुरू आहे. नाशिकपासून जवळ असल्याने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना हे विमानतळ अधिक सोयीचे ठरेल. त्यामुळे संभाव्य गर्दी आणि नाशिक विमानतळाची क्षमता लक्षात घेऊन शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली. या विकास योजनेत आठ वाहनतळे, दोन हेलिपॅड आणि टर्मिनलच्या आधुनिकीकरणाचा समावेश आहे. कुंभमेळ्यादरम्यान विमाने आणि हेलिकॉप्टरच्या वाहतुकीसाठी याचा मोठा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई बदलापूरमधील एका खासगी शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडी मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात स्पष्ट आदेश देऊनही संबंधित 5 पोलिसांविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयाने शुक्रवारी (25 एप्रिल) पोलिसांना फटकारले. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर बदलापूर एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने पोलिसांना आदेश देऊनही पाच पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आलेल्या दिरंगाईवर गंभीर चिंता व्यक्त केली. इतकेच नव्हे, तर या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) हस्तांतरित करण्याचे आदेश न्यायालयाने 7 एप्रिल रोजी दिले होते. या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर  संगमनेर तालुक्यातील २०२५-३० यादरम्यान मुदत संपणाऱ्या १४४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण अखेर जाहीर करण्यात आले आहे. बुधवारी संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या उपस्थितीत सरपंच पदासाठी राखीव जागांची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. शुक्रवारी या ग्रामपंचायतीमधील महिला आरक्षण पदासाठीची सोडत काढण्यात आली. महिला आरक्षण निश्चित झाल्याने संगमनेर तालुक्यातील १४४ ग्रामपंचायतचे चित्र स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत गाव कारभारी निश्चित झाल्याने काही खुशी कही गम असे चित्र निर्माण झाले आहे. महत्त्वाच्या काही ग्रामपंचायतींचे सूत्रे महिलांच्या हाती जाणार असल्याने पुरुषांमध्ये निराशा बघावयास मिळाली. शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरक्षण सोडतीवेळी संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी मोठी गर्दी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर  राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने जाहीर केलेल्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत गुणवत्तेच्या क्रमवारीत संगमनेर बाजार समितीने अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम, तर संपूर्ण नाशिक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती सभापती शंकरराव खेमनर आणि सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली. महाराष्ट्र सरकारच्या पणन विभागाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यातील तब्बल ३०५ बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी नुकतीच जाहीर केली. यासाठी निबंधक आणि सहाय्यक निबंधक यांनी कसून तपासणी करून विविध निकषांनुसार मूल्यांकन केले होते. या मूल्यांकनात २०२३-२४ या वर्षासाठी संगमनेर कृषी उत्पन्न…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर काश्मीर मधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या जिहादी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर शहरात शनिवारी, (२६ एप्रिल) भव्य तिरंगा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजासह शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत या संतापजनक घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. पहलगाम येथे झालेल्या अमानुष हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना धर्म विचारून, त्यांना कलमा वाचायला लावून त्यांचे कपडे उतरवून विटंबना केली. या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यातील शहीद बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि देशविघातक शक्तींना कठोर प्रत्युत्तर देण्यासाठी संगमनेरमधील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत या तिरंगा मोर्चाचे आयोजन केले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सोशल मीडियावर समर्थन केल्याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील दोघा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान शौकत पटेल (रा. चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर) याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पहायला मिळतील दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणारे स्टेटस ठेवले होते. त्याचा मित्र मुजाहिद आरिफ पठाण (रा. साकूर, ता. संगमनेर, सध्या रा. अहमदनगर) याने हे स्टेटस लाईक करत समर्थन दर्शविल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या कृत्यामुळे समाजात अशांतता निर्माण होण्याची शक्यता असल्याने, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते अमित कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करत…

Read More

अहिल्यानगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त येत्या ३१ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. आता ही बैठक मुंबई येथे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर, चौंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करून या उपक्रमांना अधिक गती देण्याचा सरकारचा विचार होता. यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी देखील सुरू होती. मात्र, अनपेक्षितपणे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठक रद्द करण्यामागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर गुरुवार, दि. २४ एप्रिल – लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या पत्रकार रमजान नजीर शेख याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील फिर्यादी यांच्याकडे खडी वाहतूक करणारे चार ट्रक आहेत. २० मार्च २०२५ रोजी तलाठी अक्षय ढोकळे यांनी दोन ट्रकवर खोटी कारवाई करून प्रत्येकी एक लाख तेवीस हजार रुपये दंड आकारला होता. अर्जदार रमजान शेख हे मांडवे गावात पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी फिर्यादीला तलाठी अक्षय ढोकळे यांच्याशी भेट करून देण्याची मध्यस्थी केली, जेणेकरून ‘सेटलमेंट’ करता येईल. मात्र, तलाठी लाच मागणार, या विचाराने फिर्यादीने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर  अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहे. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये ९ मे २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अहिल्या नगर जिल्ह्यात सर्वत्र या आदेश लागू असतील. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेत यात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या या आदेशाचा भंग करत कायदा व सुव्यवस्थेला…

Read More