Author: अनंत पांगारकर

असा असेल आजचा दिवस मेष – मेष राशीचे लोक प्रिय व्यक्तीशी भांडण करू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्यासाठी नाते येऊ शकते. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांना लवकरच नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. आज, आपण बऱ्याच काळापासून आपली नोकरी बदलण्याचा प्रयत्न करीत होते, ती संधी आज आहे. आज आपण आपल्या व्यवसायात नवीन योजना लागू करू शकता, जी आपल्याला भविष्यात उत्कृष्ट परिणाम देईल. मिथुन – मिथुन राशीच्या लोकांसाठी आज अति गोड लोकांपासून सावध राहा, हे लोक तुमची फसवणूक करू शकतात. कोणत्याही भांडणापासून स्वतःला दूर ठेवा.…

Read More

शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट  मुंबई – आदिवासी भागातील पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेचा निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती न्यायालयाला करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पेसा क्षेत्रातील भरतीचा प्रश्नासह इतर विषयांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे गुरुवारी उशिराने बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पेसा क्षेत्रातील भरतीसाठी नाशिक येथे उपोषणास बसलेल्या जे. पी. गावित यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आदिवासी बांधवांचा विकास हा आमच्या प्राधान्याचा विषय आहे. आदिवासी भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी तेथील गावाच्या विकासासाठी ग्रामसभा सक्षम करण्यासाठी…

Read More

गुरुवार, दि. २९ ऑगस्ट  मुंबई : उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र शासनाने इथेनॅाल निर्मितीवर घातलेले निर्बंध २०२४-२५ गाळप हंगामात उठवले आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाने आज…

Read More

गुरुवार, २९ ऑगस्ट  मुंबई – गृह विभागाने गुरुवारी राज्यातील सात पोलीस उपाधीक्षकांच्या बढतीवर बदल्या केल्या आहेत. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचा यात समावेश असून त्यांची बदली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५, दौंड येथे समादेशक म्हणून झाली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. पोलीस अधीक्षक, पोलीस उप आयुक्त (असंवर्ग) पदावर या अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. या संबंधीच्या आदेश गुरुवारी शासनाचे अपर सचिव संदीप ढाकणे यांनी काढले आहेत बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात मिळालेली पदोन्नती)… नरसिंग पंचम यादव (नियंत्रक, नागरिक संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई)  सोमनाथ फकीरा वाघचौरे (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक…

Read More

गुरुवार दि.२९ ऑगस्ट  अहमदनगर : संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरिता भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत ० ते १८ वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी ‘चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८’ हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना २४x७ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. सदर सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ.…

Read More

गुरुवार, दि. २९ ऑगस्ट अहमदनगर : राज्य शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरीता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृतीसह जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा…

Read More

गुरुवार दि.२९ ऑगस्ट  अहमदनगर : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सर्व नागरिकांना आधारशी संलग्न ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत असणे आवश्यक असून नागरिकांनी आधारशी संलग्न माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात शासकीय १०२ आधार केंद्र, महिला बाल विकास विभागाच्या ६९ आधार केंद्र, सीएससी ई-गव्हर्नन्स चे ७५ केंद्र, बँकेचे १४, बीएसएनएलचे ४, पोस्ट ऑफिसच्या ९८ अशा जिल्ह्यातील एकूण ३८८ आधार केंद्रांवर आधार नोंदणी आणि माहिती अद्ययावत करता येईल. महिला व बालकल्याण विभागांतर्गत ० ते ५ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडीमध्ये करण्यात येत आहे. ही नोंदणी नि:शुल्क आहे. बालकांच्या नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये ६९…

Read More

गुरुवार, २९ ऑगस्ट मुंबई : मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधितांची बैठक बोलाविली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री…

Read More

गुरुवार, २९ ऑगस्ट संगमनेर : शेतात मेंढपाळ कळपासह मुक्काम करत असताना मेंढ्यावर हल्ला करण्यासाठी गेलेल्या बिबट्याला रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने गुराखी महिलेला ओरबाडले. पती मदतीसाठी धावताच बिबट्या पळाला यात महिला जखमी झाल्याची घटना वडगाव लांडगा येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी, साकुर येथील मेंढपाळ आपला मेंढ्याचा कळप घेवून फिरत असतांना रात्रीच्या वेळी मारुती लांडगे यांच्या शेताजवळ मुक्कामासाठी थांबले. मंगळवारी (२६ ऑगस्ट) पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्या मेंढ्याची शिकार करण्यासाठी आला. याच ठिकाणी मेंढपाळ पती-पत्नी येथेच झोपलेले होते. कळप पाहून बिबट्याने मेंढ्यावर हल्ला करण्यासाठी झडप टाकली. मात्र रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने बिबट्याचा पंजा महीलेच्या गालाला लागल्याने त्यांना जाग आली. यामुळे…

Read More

गुरुवार, २९ ऑगस्ट चालढकल आणि गांभीर्य नसणे यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ताशेरे ओढत राज्य सरकारला पुन्हा एकदा ‘लाडकी बहीण योजना’ थांबविण्याचा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा या योजनेच्या अनुषंगाने सरकारचे कान पिळले आहेत. पुण्यातील पाषाण परिसरातील खाजगी मालकीची जमीन अधिग्रहित केल्यानंतर राज्य सरकारने मूळ जमीन मालकांना त्या जमिनीचा योग्य मोबदला दिला नाही. त्यामुळे जमीन मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जमीन अधिग्रहण प्रकरणाच्या या नुकसान भरपाईवरून राज्य सरकार चालढकल करत असून सरकारला याचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. राज्य सरकारने अर्जदाराला देण्याची भरपाईची रक्कम पुन्हा मोजून सादर न…

Read More