Author: अनंत पांगारकर

संगमनेर दि. ३० – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. आरक्षणाशिवाय सुरू असलेली ही भारतीय प्रक्रिया थांबविण्याची मागणी संगमनेर मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी संगमनेरचे नवनियुक्त आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे. दरम्यान जिल्हा बँकेवर जिल्ह्यातील बड्या नेत्यांचे वर्चस्व असल्याने आमदार खताळ या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. हिरालाल पगडाल, के. जी. भालेराव, राजाभाऊ अवसक, ॲड. किरण रोहम, सिताराम राऊत, अरुण ताजने, सूर्यकांत शिंदे, अरविंद सांगळे, प्राध्यापक बाबा खरात, विकास वाव्हळ, विश्वनाथ आल्हाट, हनुमंत उबाळे, सुखदेव मोहिते, ज्ञानेश्वर राक्षे, मनोज उपरे, संजय दारोळे, प्रशांत गायकवाड, अंतोन घोडके, दिलीप पराड, डॉ. दानिश खान, अमोल जगताप,…

Read More

अहिल्यानगर दि. ३०-  दिव्यांगांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हीईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे.  या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत https://register.mshfdc.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व्हावे तसेच सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांगांना त्यांच्या कुटुंबासमवेत जगण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे.

Read More

मुंबई दि. २९ : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरीता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरीता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करणेबाबत समिती गठीत आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. या समितीमध्ये संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) हे अध्यक्ष असतील. तसेच, आरोग्य संचालनालय (मुंबई) चे संचालक, आयुष संचालनालय (मुंबई) चे संचालक, सर ज. जी रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता, लोकमान्य टिळक स्मारक रुग्णालयाचे (सायन) अधिष्ठाता, मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (मुंबई) माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय…

Read More

मुंबई दि. २९- नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली आहे. माजी मंत्री व तत्कालीन आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी निधी मिळविला आहे. मात्र राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातील ही सर्व कामे रखडवून ठेवली आहेत. रस्ते दुरुस्तीसह रखडून ठेवण्यात आलेल्या सर्व कामांना तात्काळ गती देण्यात यावी या मागणीसाठी तांबे यांनी भोसले यांची भेट घेतली. आमदार तांबे यांनी म्हटले आहे की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावच्या विकासासाठी निधी दिला. अनेक रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला. परंतु मागील तीन वर्षापासून सत्ताधाऱ्यांनी निधी मंजूर…

Read More

संगमनेर दि. २९-  रात्रीच्या वेळी गस्त घालत असतांना संगमनेर तालुका पोलिसांनी निळवंडे शिवारात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इंडिका कारचा पाठलाग करून दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले तर या कारवाईदरम्यान दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी पकडलेल्या संशयित आरोपींकडून गावठी कट्टा, कोयता, चार मोबाईल, इंडिका कार जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली. मंगळवारी (दि. २८) पहाटे साडे पाच वाजेच्या तालुका पोलीस स्टेशनचे गस्तीचे अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल संपत जायभाये, चालक कोकणे हे मोबाईल पेट्रोलींग करून निळवंडे मार्गे करुन वडगावपानकडे येत असतांना त्यांना समोरून एक पांढऱ्या रंगाची इंडिका कार (क्र. एम. एच. २३ ई ६८४७) हि निळवंडे-कवठे कमळेश्वर रस्त्यांने वेगांने…

Read More

संगमनेर – नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या संगमनेर शहरातील नवश्या गणपती मंदिर स्थापनेला २५ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर गणेश जयंती पासून विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रमुख कार्यकर्ते अमोल डुकरे यांनी दिली आहे. गणेश जयंतीला (शनिवार दि. १ फेब्रुवारी) सकाळी सव्वा सहा वाजता नवश्या गणपतीला महा अभिषेक करून महाआरती केली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पावणे सात वाजता महाआरती व त्यानंतर सात वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अंधकलाकारांचा भावगीते व भक्ती गीतांचा कार्यक्रम मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांपासून अमोल डुकरे व परिसरातील…

Read More

नागपूर, दि. २९ :  लोकशाही व्यवस्थेमध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे. न्यायव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण पाहतो. आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास हा न्यायव्यवस्थेवर आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली विधी महाविद्यालये व अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर, प्राचार्य डॉ. रविशंकर मोर, रजिस्ट्रार डॉ. राजू हिवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री…

Read More

मुंबई, दि. २८ : राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली असून केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. ३० डिसेंबर २०२४ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये राज्यात विविध घटनांमध्ये बारा वाघांचा मृत्यू झाला. पाच वाघांचा मृत्यू आपापसातील संघर्षातून जखमी झाल्याने, आजारपणामुळे इत्यादी नैसर्गिक कारणांनी झालेला आहे. चार वाघांचा मृत्यू अन्य जनावरांसाठी लावण्यात आलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागल्याने झाला आहे. किंवा वाहनांच्या धडकेने झाला…

Read More

संगमनेर दि. २८- संगमनेरचा विकास रोखू पाहणाऱ्यांनी आता विकासाबरोबरच येथील एकजूट मोजण्यासाठी राजकीय उद्देश समोर ठेवून प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रस्तावित आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड सुरू केली असून कोणत्याही स्थितीत सत्ताधाऱ्यांचा हा प्रकार सहन केला जाणार नसल्याचा इशारा राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी महसूल शाखा यांनी पत्र क्र. प्रा. फे.ब.2022 /प्रक्र. 94/म -10, दिनांक 17 जानेवारी 2023 या राजकीय दबावातून काढलेल्या अध्यादेशातून संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत घाट घातला आहे. खरे तर संगमनेर तालुका हा…

Read More

काही रकमेचा दिला परतावा… नंतर मात्र केली फसवणूक  नाशिक – मोठी गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतवा देण्याचे आमिष दाखवत काही भामट्यांनी नाशिक शहरातील वृद्धाला तब्बल ३६ लाखाला गंडविल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या भामट्यांनी वृद्ध व्यक्तीला काही रकमेचा परतवा देत विश्वास संपादन केला होता. या विश्वासातून भामट्यांनी वृद्ध व्यक्तीला मोठी गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. इंदिरानगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात अरुण हरी शिंपी (वय ७२, रा. गजानन दर्शन सोसायटी, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अलका गोरे (रा. बर्डे नगर, आडगाव नाका) व हिरामण भामरे (रा. समर्थ नगर, इंदिरानगर) या ठकबाजी करणाऱ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी शिंपी यांचा…

Read More