Author: अनंत पांगारकर
गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शनिवारपासून उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतल आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणी सरकारला १ महिन्याची मुदत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या एका महिन्यात सरकारने मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू, असा इशारादेखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. यांनी केली मध्यस्थी… महायुती सरकारमधील मंत्री शंभूराजे देसाई, राणा जगजीतसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी गुरुवारी जालन्याच्या आंतरवाली सराटी येथे जाऊन उपोषणार्थ जरांगे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सरकार कशा पद्धतीने काम करत आहे, याबाबतची माहिती…
गुरुवार दिनांक १३ जून २०२४ नाशिक शिक्षक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची अंतिम यादी जाहीर झाली आहे. नाशिकच्या जागेसाठी तब्बल २१ उमेदवार मैदानात उतरले आहे. त्यातच महायुतीत अजित पवार गटाकडून बंडखोरी झाल्याने आता ही निवडणूक चौरंगी बनली आहे. महायुती सरकारमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माघारीच्या अंतिम दिवशी नाशिकमध्ये येऊन विनंती केल्यानंतर त्यांचे बंधू प्रवरा अभिमत विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र विखे यांनी माघार घेतली. याच दरम्यान काँग्रेसचे दिलीप पाटील आणि भाजप इच्छुक धनराज विसपुते यांनीही माघार घेतली. मात्र अजीत पवार गटाचे महेंद्र भावसार यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीत बंडखोरीचे वारे कायम आहे. असे असले तरी नाशिकमध्ये शिंदे सेनेचे किशोर दराडे,…
गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ संगमनेरच्या उपनगरातील मालदाड रोडवरील रहिवासी असलेला तरुण महेश अरुण पडघलमल (वय ३४ वर्षे) हा गाडीवर क्लीनर म्हणून गुजरातमध्ये गेला. तो अंकलेश्वर येथून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली असून त्याच्या कुटुंबीयांनी अंकलेश्वर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. सात दिवसांचा कालावधी उलटून देखील अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. महेश पडघलमल हा मालवाहतूक गाडीवर क्लीनर म्हणून काम करत असून सोमनाथ माधव सातपुते याच्याबरोबर तो ३ जूनला गुजरातच्या अंकलेश्वर येथे गेला होता. मात्र पाच तारखेला तो बेपत्ता झाल्याची माहिती सोमनाथ सातपुते यांनी महेश पडघलमल याच्या घरी दूरध्वनी करून कळविली होती. त्यामुळे कुटुंबियांनी तातडीने अंकलेश्वर येथे जात…
गुरुवार दिनांक १३ जून २०२४ गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली इर्टिका कार सोडून देण्याच्या बदल्यात दहा हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कैलास विश्वनाथ ठाकूर (वय ५६ वर्ष) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात लाच लुचपत विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी, तक्रारदाराविरुद्ध निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराची इर्टिका कार जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली कार सोडून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक ठाकूर याने प्रथमत: पंधरा…
गुरुवार दिनांक १३ जून २०२४ वेतनश्रेणीच्या फरकाच्या बिलाचे काम करून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापिकेला नगरच्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. श्रीमती संगीता नंदलाल पवार असे लाचखोर मुख्याध्यापिकेचे नाव आहे. नगरच्या श्रीरामपूरमध्ये लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. गेल्या आठवड्यात शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या हेडमास्तरला शेजारच्या बीड जिल्ह्यात पकडले होते त्या पाठोपाठ आता नगर जिल्ह्यातील मुख्याध्यापिकेवर लाचेची कारवाई झाली आहे. तक्रारदाराची पत्नी श्रीरामपूरच्या सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सदरची शाळा अनुदानित असून तक्रारदाराच्या पत्नीला २०१५ ते २०२२ या कालावधीतील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम…
गुरुवार, दिनांक १३ जून २०२४ अहमदनगर जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी खते बियाणे आणि कीटकनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे मात्र बियाण्यांची खताची साठेबाजी, लिंकिंग होत असेल तर शेतकऱ्यांनी १८००२३३४००० या मोफत टोल फ्री क्रमांकावर किंवा ९८२२४४६६५५ या मोबाईल क्रमांकावर नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क करत तक्रार करण्याचे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बुधवारी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी आशिष नवले यांच्यासह जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निविष्ठांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग करत शेतकऱ्यांना अडचण…
बुधवार दिनांक १२ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे चित्र अस्पष्ट झाले असून निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १५ जणांनी माघार घेतल्याने आता निवडणुकीच्या मैदानात २१ उमेदवार राहिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. निवडणूक घडविण्यासाठी पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरलेल्या डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना संधी देण्यात आली असून ॲड. संदीप गुळवे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. याशिवाय भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे अपक्ष…
विशेष प्रतिनिधी / मुंबई काश्मीर आणि मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटनांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय. सरसंघचालकांचं विधान पंतप्रधान किती गांभीर्यानं घेणार माहिती नाही. आता तरी ते मणिपूरला जाणार का? मागील आठ दिवसात तिसऱ्यांदा काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केलाय. याला जबाबदार कोण? जरी केंद्रात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं असलं तरी काश्मीरमधील हल्ले काही थांबत नाहीत? काश्मीरमध्ये ३७० कलम काढल्यानंतरसुद्धा लोकांचे जीव जात आहेत. याकडे केंद्र सरकार गांभीर्यानं का बघत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मणिपूर मुद्यावर एक वर्षानंतर सरसंघचालक मोहन भागवत बोलले हे काही कमी नाही. एक वर्षानंतरही मणिपूर अजून धुमसतंय. परंतु केंद्राकडून यावर कोणताच तोडगा काढला जात नाही. मात्र…
विशेष प्रतिनिधी / मुंबई प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बीड लोकसभा निवणुकीच्या मतदानात महायुतीचे नेते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी केलेल्या मदतीमुळे आपल्याला यश मिळू शकले, या विजयी उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या दाव्याने एकच खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. अशात बजरंग सोनवणे यांच्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ उडवून दिली आहे. माझ्या विजयामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांचा वाटा आहे, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे. आमचे नेते शरद पवार यांच्या कुशल नेतृत्वाने माझ्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली.…
बुधवार, दिनांक १२ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या विवेक कोल्हे यांच्या संस्थांवर शासनाच्या विविध विभागाकडून छापे टाकण्यात आले असून शासनाची विविध पथके कोपरगावात कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांची चौकशी करत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे कोल्हे हे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र आहेत. कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील सत्ताधाऱ्यांची गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क, शिक्षण विभाग आदींसह शासनाची विविध पथके या संदर्भात चौकशी करत असून कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करण्याचा निर्णय कायम ठेवल्याने ही कारवाई झाल्याचे…
