Author: अनंत पांगारकर
विशेष प्रतिनिधी / मुंबई समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाची भलामण केलेल्या वक्तव्यापासून माघार घेत आपलं वक्तव्य मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. आज त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या विधानावरून सभागृहात गोंधळ घातला. परिणामी, विधीमंडळाचं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अबू आझमी यांनी आज विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी व्यक्त केलेल्या संतप्त प्रतिक्रिया पाहून मवाळ भूमिका घेत आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. ते म्हणाले, मी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं नाही, माझ्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी माहिती लपवली, राज्य सरकारलाही सहआरोपी करा पाशवी बहुमताच्या आधारे सरकार सभागृह चालू देत नाही मुंबई, दि. ४ मार्च २०२५ बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रुरपद्धतीने केली, याची गृहखात्याकडे माहिती नव्हती का? असा संपप्त सवाल करत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अपमान आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उद्या हक्कभंग आणू, असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकाल सोडून अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर…
संगमनेर, दि. ४ मार्च अपघातात मृत्यू पावलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या दोघा संचालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या कुटुंबीयांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. शेतकरी व सभासदांचे हित जोपासताना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने संगमनेर तालुक्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामुळे थोरात कारखान्याने सुरक्षितता म्हणून सर्व सभासदांचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा अपघाती विमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून उतरविला आहे. आश्वी बुद्रुक येथील जाखोजी राणू पिलघर यांचा काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर-मनमाड मार्गावर अपघाती मृत्यू झाला होता. तर वडगाव पान येथील साहेबराव…
मुंबई, दि. ४ मार्च – प्रतिनिधी नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग सरळ मार्गानेच झाला पाहिजे, यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले आहे. बैठकीत सरळ मार्गाचा पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्रालय यांच्या सोबत बैठक घेण्याचा निर्णय उपस्थित लोकप्रतिनिधींनी घेतल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी आज (४ मार्च) मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांवर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली. तसेच, सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गातील सर्व लोकप्रतिनिधी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले. या भागाच्या विकासासाठी सर्वांनी…
संगमनेर – प्रतिनिधी सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यात वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. या समस्यांबाबत महावितरणाने तात्काळ उपाययोजना करून ह्या प्रश्नाबाबत तातडीने मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. तालुक्यातील नागरिकांच्यावतीने वीज वितरण कंपनीला हे निवेदन देण्यात आले असून यावेळी अरुण गुंजाळ, नामदेव शिंदे, वीरधवल साबळे, दीपक शिंदे, सुहास आहेर, प्रीतम साबळे, सुनील काळे, विजय राहणे, भाऊराव रहाणे, ताराचंद शिंदे, विलास मोरे आदींसह शेतकरी संख्येने उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, रोटेशन कालावधीमध्ये यापूर्वी प्रवरा नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना अखंडित व…
संगमनेर, दि. ४ मार्च महावितरण कडून विजेचा सुरू असलेला खेळ खंडोबा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्ण दाबाने वीज दिली जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर शेतीचे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे दिवसा सलग आठ तास वीज मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शनिवारी (८ मार्च) महावितरण विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणगाव, शिवापूर, मेंढवन परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी महावितरण च्या कार्यकारी अभियंतांना आपल्या मागणीचे निवेदन दिले असून महावितरण कंपनीने विजेचा प्रश्न सोडविला नाही आणि शेतकऱ्यांच्या जीवितास वन्य प्राण्यापासून धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार असेल असा इशारा दिला आहे. निवेदनात ग्रामस्थांनी शेतीपंपासाठी दोन हप्ते दिवसा, एक हप्ता रात्री तसेच शक्य…
मुंबई – लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता मार्चमध्ये दिला जाणार आहे. ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हा हप्ता लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या महिन्यात सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून हे अधिवेशन संपल्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता देखील मार्च अखेर दिला जाणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानभवनात पत्रकारांना ही माहिती दिली. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच महिला दिनाचे गिफ्ट असणार आहे. फेब्रुवारी महिना संपला तरीदेखील फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या लाभार्थी बहिणीच्या खात्यावर जमा न झाल्याने बहिणींमध्ये चलबिचल सुरू होती. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या…
विशेष प्रतिनिधी / मुंबई केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी अजून फरार आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या पुतण्याचाही समावेश आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची मुक्ताईनगरमधील कोथळी गावातील संत मुक्ताई जत्रेत छेडछाड काढण्यात आली. रविवारी ही घटना समोर आल्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि मुलीचे आजोबा माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आक्रमक झाले. घटनेला दोन दिवस झाले तरी आरोपींवर साधी कारवाई देखील करण्यात…
मुंबई, दि. ३ मार्च विधान परिषदेच्या पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषदेतील पाच सदस्य विधानसभा निवडणुकीत निवडून गेल्याने विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या. विशेष म्हणजे या पाचही जागा महायुतीच्या आहेत. रिक्त झालेल्या पाच जागेवर कोणाची वर्णी लागते याची आता राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे. विधान परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराला १० मार्च ते १७ मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत आहे. तर २० तारखेला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. या पाच जागांसाठी २७ मार्चला निवडणूक होईल. यासाठी केंद्रीय निवडणुक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गट एक, अजित पवार…
संगमनेर, दि. ३ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्याची तोडफोड करण्याच्या उद्देशाने आश्वी बुद्रुक येथे प्रस्तावित केलेल्या अप्पर तहसील कार्यालयाला संपूर्ण संगमनेर तालुक्यातून मोठा विरोध होत आहे. जोर्वे येथील ग्रामसभेत या तहसील कार्यालयातला कडकडून विरोध करण्याचा ठराव एकमताने संबंध झाला. यावेळी विखे समर्थकांनी आश्वी येथेच कार्यालय करण्याची मागणी केली. यावर संपूर्ण गावातील नागरिक महिला व युवक आक्रमक झाल्याने विखे समर्थकांनी पळ काढला. जोर्वे येथील ग्रामपंचायतच्यावतीने जुने गावातील पारावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या ग्रामसभेत एकमताने आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अपर तहसील कार्यालयाला विरोधाचा ठराव मांडण्यात आला. याला सर्व गावाने झालेल्या मतदानातून संमती दर्शवली. मात्र तालुक्याच्या आणि जोर्वे गावच्या कायम…
