Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: साकुर पठार भागातील विविध गावांसह साकुर ते बिरेवाडी आणि रणखांबवाडी ते दिग्रस या रस्त्यांसाठीचा सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात, ऑक्टोबर २०२४ पूर्वीच मंजूर झालेला आहे. नवीन लोकप्रतिनिधींनी यासाठी एक रुपयाचाही निधी आणलेला नसून, त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम बंद करावे, अशी टीका जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मीराताई शेटे यांनी केली आहे. बिरेवाडी येथे पालकमंत्री आणि नवीन लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या रस्ते कामांच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर शेटे बोलत होत्या. डिग्रस ते रणखांबवाडी हे काम बाळासाहेब थोरात यांच्या २५-१५ निधीअंतर्गत मंजूर झाले होते. तसेच साकुर ते बिरेवाडी आणि तासकरवाडी ते खंडेरायवाडी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून उधारीपोटी मिळालेला तीन लाख रुपयांचा धनादेश न वटल्याचा दावा करणाऱ्या फिर्यादीला न्यायालयात आपला अधिकृत व्यवसाय सिद्ध करता आला नाही. त्यामुळे न्यायालयाने संशयाचा फायदा देत आरोपीची गुन्हातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर मधील एका महत्त्वपूर्ण फौजदारी खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चं. प्र. रघुवंशी यांनी हा निवाडा केला. या खटल्याची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी समीर रमेश महाले (रा. जयभारत चौक, संगमनेर) यांचा सोन्याचा व्यवसाय असून आरोपी संतोष यादवराव काळे (रा. नेहरू चौक, संगमनेर) यांच्याशी त्यांची मैत्री होती. फिर्यादीच्या दाव्यानुसार, आरोपीने २० ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांच्याकडून ४ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीचे…
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा देशप्रेमाचे उमाळे येऊ लागले आहेत. राजाने काही सांगावे आणि प्रजेने थुंकी गिळल्याप्रमाणे त्याचा अंमल करावा, असे मजेशीर पण खऱ्या देशभक्ताला उबग येईल असे उद्योग सुरू झाले आहेत. ‘बघूया कोण आधी…’ अशी ही स्पर्धा! या स्पर्धेत स्वतःच्या मागे हुशारीचा मुलामा लावलेला महाराष्ट्र पुढे आहे हे पाहून कपाळावर हात मारावा की काय, असे वाटू लागले आहे. जगभर कोविडची साथ आली, तेव्हाही आपल्या अनपढ प्रजेने तेच केले जे अर्धवट राजाने त्यांच्या डोक्यात भरवले होते. आताही तेच सुरू आहे; फरक इतकाच की राजाचा खोटेपणा पचवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. तेव्हा ते करायची आवश्यकता पडली नव्हती, कारण…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साही राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे वातावरण राहील आणि प्रलंबित कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. आरोग्याची साथ उत्तम लाभेल, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फले मिळतील. दिवसाच्या सुरुवातीला कामाचा ताण जाणवू शकतो, परंतु दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. कौटुंबिक जीवनात जोडीदाराशी असलेले संबंध सौहार्दाचे राहतील. बोलण्यावर ताबा ठेवल्यास विनाकारण होणारे वाद टाळता येतील. मानसिक शांततेसाठी अध्यात्माकडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेरसह अहिल्यानगर व नाशिक जिल्हा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिअर बार आणि हॉटेलचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. पोलिसांनी या टोळीतील पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खंदरमाळवाडी येथील किशोर बाळाजी डोके यांच्या ‘हॉटेल निलायम बार’चे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी ३ लाख ६ हजार १९० रुपये किमतीची विदेशी दारू, सिगारेट आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या गंभीर आरोपावरून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मोठा निर्णय घेत, लोकनियुक्त सरपंच आणि उपसरपंचासह एकूण पाच सदस्यांना अपात्र ठरवले आहे. या निर्णयामुळे केवळ घुलेवाडीतच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, घुलेवाडी येथील सरपंच, उपसरपंच आणि काही सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याचा वैयक्तिक लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात शिवसेनेचे शाखाप्रमुख शरद पानसरे यांनी पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी चालून येतील, ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र खर्च करताना थोडे नियोजन करणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा चांगला काळ आहे. व्यवसायात धनलाभाचे योग असून नवीन गुंतवणुकीचा विचार करू शकता. मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. घरात एखादे मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळेल. मिथुन: दिवसाची सुरुवात थोड्या धावपळीची होऊ शकते, पण…
वैद्यकीय अधिकाऱ्याची बदनामी केल्याप्रकरणी संगमनेरात वृत्तपत्र संपादकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत सुरेश थोरात यांची समाजमाध्यमे आणि वृत्तपत्राद्वारे बदनामी केल्याप्रकरणी ‘बांधीलकी जनहिताची… नायक’ या सायं दैनिकाचे संपादक गोरक्षनाथ मदने आणि कार्यकारी संपादक शाम तिवारी यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, ९ मे २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे सिद्धार्थ नितीन कुमार या २७ वर्षीय तरुणाला मृत अवस्थेत आणण्यात आले होते. डॉ. थोरात यांनी कर्तव्यावर असताना मृतदेहाची तपासणी केली असता, मृताच्या नाका-तोंडातून रक्त येत असल्याचे आणि…
संगमनेर : अवघ्या महाराष्ट्रात तमाशा कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांना येत्या 25 मे रोजी देशाच्या अतिशय प्रतिष्ठित अशा पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने अवर गृहसचिव कमलेश रबिदास यांनी आज (दि. 15 मे) या सोहळ्याचे तपशील पाठवले आहेत. 25 मे रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार सोहळ्याची रंगीत तालीम होणार आहे तर त्याच दिवशी सायंकाळी राष्ट्रपती भवनात पाच वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रघुवीर खेडकर यांना पदमश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची अस्सल लोककला अशी ओळख असलेल्या लोकनाट्य तमाशा क्षेत्रात रघुवीर खेडकर हे पद्म पुरस्कार मिळवणारे पाहिले कलाकार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व विभागांनी आवश्यक ती पूर्वतयारी वेळेत पूर्ण करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवावी. टंचाई निवारण, पूर प्रतिबंधक उपाययोजना, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आणि रस्ते दुरुस्ती यांसारख्या कामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्व यंत्रणांनी अधिक संवेदनशील होऊन आणि परस्परांमध्ये समन्वय राखून काम करावे, अशा कडक सूचना महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई व मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे…
