Author: अनंत पांगारकर
अहमदनगर, दि. ७ मार्च केवळ सत्तेसाठी भाजपमध्ये नव्याने आलेल्या लोकांमुळे जुन्या निष्ठावंतांवर अन्याय सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांच्या एका निर्णयामुळे संगमनेर भाजपाची अंतर्गत धुसफूस समोर आली, असे असले तरी स्वतःचाच निर्णय पुन्हा फिरविण्याची आफत भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर ओढावली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर नगर जिल्ह्यातही विखे व्हर्सेस भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधील हा संघर्ष सातत्याने बघावयास मिळत आहे. नव्या जुन्यातील संघर्ष आणि अंतर्गत वादामुळे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे चांगलेच अडचणीत सापडले असल्याचे दिसत आहे. बुधवारी संगमनेर तालुका मंडळ कार्यकारिणी रद्द केल्याचा स्वतःचाच दिलेला आदेश गुरुवारी पुन्हा २४ तासाच्या आत फिरविण्याची व आहे तीच कार्यकारिणी…
कोल्हापूर, दि. ७ मार्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाहेर पडताना गद्दारीचा शिक्का माथी बसलेल्या मुख्यमंत्री शिंदे गटातील काही खासदारांचा पत्ता भाजप कट करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या खासदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून काहीही करा, पण उमेदवारी द्या, धनुष्यबाण मिळणार नसेल तर कमळावर लढू! असं साकडं या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना घातल आहे. या मागणीसाठी खासदारांनी दबाव गट तयार केला अजून दोन दिवसात ते एकत्रित भेटणार असल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे. शिवसेना फुटीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील तेरा खासदार गेले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी आणि भरपूर निधी असा शब्द त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी…
संगमनेर दि. ६ मार्च युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांची तर जिल्हा सरचिटणीसपदी निलेश थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. जयश्री थोरात यांची या माध्यमातून सक्रिय राजकारणात वाटचाल सुरू झाली असून या माध्यमातून नव्या युवा पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे प्रभारी उदयभानू, जिल्हा प्रभारी रोहित कुमार आणि सहप्रभारी एहसान खान यांनी ही निवड जाहीर केली. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी डॉ. जयश्री यांच्या निवडीची घेषणा केली. डॉ. थोरात या कॅन्सर तज्ज्ञ असून मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. अभ्यासू आणि सेवाभावी…
संगमनेर, दि. ६ मार्च गंभीर दुखापतीने मैदानाबाहेर रहावे लागलेल्या बेसबॉलपटू तुषार सोनावणे याची संगमनेरचे आर्थो सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी यशस्वीरित्या लिगामेंट शस्त्रक्रिया केल्याने तुषार सोनावणेची अखिल भारतीय आंतरविद्यापिठ स्पर्धेच्या पुणे विद्यापिठ संघात निवड झाल्याची माहीती संगमनेर तालुका बेसबॉल असोशिएशनचे अध्यक्ष वैभव दिवेकर यांनी दिली. दिवेकर यांनी सांगितले की, तुषार सोनावणे हा एक उत्कृष्ट बेसबॉलपटू असून अनेक स्पर्धांमध्ये संगमनेर महाविद्यालयाचे प्रतीनिधीत्व करीत उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत आला आहे. मात्र काही दिवसांपुर्वी त्याचा रस्ते अपघात होऊन पायाचे लिगामेंट फाटून तो जायबंदी झाला व त्यामुळे अनफिट होऊन घरी बसावे लागले होते. आम्ही त्यास अस्थिरोगतज्ञ डॉ. सौरभ पगडाल यांच्याकडे नेले असता त्यांनी शस्त्रक्रिया…
संगमनेर दि. ६ मविआ सरकारच्या काळातील रामेश्वर देवस्थानच्या निधीला महायुती सरकारने सत्तेवर येताच दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठविल्याने रामेश्वर देवस्थान सुशोभीकरण व सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या कामाचे भूमिपूजन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात व डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळाला. यात रामेश्वर देवस्थानच्या ६ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश होता. राज्यात सत्तांतर होताच महायुती सरकारने या निधीला स्थगिती दिल्याने देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. न्यायालयाने स्थगिती उठविल्यानंतर आधीच्या सहा कोटी रुपयांच्या निधीत…
लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रदेश काँग्रेसची मुंबई वगळून २० लोकसभा मतदारसंघाची चर्चा – नाना पटोले लोकसभेचे उमेदवार स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन देणार, जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर मुंबई, दि. ५ मार्च लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून काँग्रेस पक्षाने आज मुंबई वगळता राज्यातील २० लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. उमेदवार देताना स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल व त्यानंतर उमेदवारांची नावे निश्चित केले जाईल. काँग्रेसच्या पक्षाच्या संभाव्य जागांवरील स्थानिक पदाधिकारी यांचे मते व राजकीय परिस्थिती याची चर्चा करण्यात आली. मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा संकल्प केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे…
अहमदनगर, दि. ५ अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७(३) अन्वये २ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.…
अहमदनगर, दि.५ भारतीय सैन्यात भरतीसाठीची अधिसूचना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली असुन इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळास भेट देऊन प्रोफाइल तयार करावी व २२ मार्च, २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन स्क्वॉड्रन लिडर विद्यासागर कोरडे, (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. सैन्यदलात अग्निवीर जीडी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर ऑफिस असिस्टंट, अग्निवीर ट्रेड्समन (१०वी आणि ८ वी पास), मिलिटरी पोलिसांसाठी अग्निवीर महिला प्रवर्ग आणि एनए सप्टेंबर मधील नियमित प्रवेशासाठी अर्ज खुले आहेत. फार्मा, टप्पा ०१ मध्ये उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना सविस्तरपणे वाचाव्यात. विषय अधिसूचनेनुसार एनसीसी उमेदवार, तांत्रिकदृष्ट्या पात्र व्यक्ती,…
सोलापूर, येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने शेकडोने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या बीडमध्ये साडेतीन हजार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोक तयार आहेत. निवडणुकीत एवढे उमेदवार उभे राहताय की, आता यांचे चिन्हच दिसणार नाही. आम्हाला न्याय मिळत नसेल तर, आधी दोन कोटी मराठा घेऊन आलो होतो आता चार कोटी मराठा घेऊन येईल असा दणदणीत इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. जरांगे सोलापूरमधील सभेत बोलत होते. ते म्हणाले समाजाने लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मराठा समाजाचा आहे. मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक आहे. फडणवीसांची भाषा…
अहमदनगर, दि. ३ नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये कौशल्य शिक्षणाला दिलेले प्राधान्य विचारात घेवून औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याचे काम विद्यापीठाच्या उपकेंद्रातून व्हावे अशी अपेक्षा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दुरदृष्य प्रणालीव्दारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा बॅकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी कुलगुरु डॉ. पराग काळकर यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.…
