Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: गत खरीप हंगामामधील पीकविमा नुकसान भरपाई अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये वाटप करण्यात आली आहे. मात्र, संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईतून अन्यायकारक रीतीने वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या २९ मे पर्यंत तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविमा नुकसान भरपाई जमा न झाल्यास, संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. मागील खरीप हंगामात संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिली होती. संगमनेर तालुक्यातही या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु,…
संगमनेर: तालुक्यातील तिगाव येथे शुक्रवारी (२२ मे) सायंकाळच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातीलच एका दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. महेश गोरक्षनाथ सानप (वय १८) आणि ओंकार गोरक्षनाथ सानप (वय १४) अशी मृत्यू झालेल्या दोन तरुण भावांची नावे आहेत. एकाच घरातील दोन सख्या भावांचा असा अचानक अंत झाल्यामुळे सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण तिगाव परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तिगाव परिसरातील एका मोठ्या दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी परिसरातील मुलांची नेहमी वर्दळ असते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास महेश आणि ओंकार…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. नवीन आर्थिक गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर आजचा काळ अनुकूल आहे. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. संध्याकाळचा वेळ जोडीदारासोबत आनंदात जाईल. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक बाबतीत अत्यंत सावध राहावे लागेल. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना घाईगडबड करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक जीवनात काही अंशी तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वादाचे…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साही राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या पराक्रमाचे आणि कष्टाचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेवाईकांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील, पण नाहक खर्च टाळणे हितकारक ठरेल. आरोग्याची साथ उत्तम लाभेल. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची भक्कम साथ मिळणार आहे. बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज गतीने पूर्ण होतील. व्यवसायात नवीन फायदेशीर करार होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती लाभेल आणि जोडीदाराशी सुसंवाद साधता येईल. मानसिक शांतता लाभल्यामुळे तुम्ही कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास सक्षम असाल. मिथुन: आजचा दिवस विचारपूर्वक पावले टाकण्याचा आहे. बोलण्यावर आणि रागावर…
विशेष प्रतिनिधी / मुंबई वारकरी संप्रदायात घुसखोर असल्याचं म्हणत विकास लवांडे यांनी काही जणांची यादी जाहीर केली होती. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात विकास लवांडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल नोंदवण्यात आला होता. पण, लवांडेंना अतिरिक्त सत्र न्यायालयाने 20 मेपर्यंत अटकपूर्ण जामीन मंजूर केला होता. तसेच तपास अधिकारी, सरकारी पक्ष आणि वाघोली पोलिसांना भूमिका मांडण्याचे निर्देश दिले होते. मात्र 20 तारीख पूर्ण होताच पुण्यातील वाघोली पोलिसांनी विकास लवांडे यांना अटक केली आहे. याप्रकरणी आता संताप व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी ‘X’ या सोशल मीडिया…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: रविवारी सायंकाळी संगमनेरमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार ह. भ. प. विकास लवांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून ते संतांचा वारकरी संप्रदाय या विषयावर बोलणार आहे. वारकरी संप्रदायाचा इतिहास, संतांचे विचार आणि त्यांचे आजच्या समाजातील महत्त्व यावर ह.भ.प. लवांडे हे सविस्तर प्रकाश टाकणार आहेत. येथील सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे हे पाचवे पुष्प असून, यात ‘संतांचा वारकरी संप्रदाय’ या महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधन होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार ह.भ.प. विकास लवांडे उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम रविवारी, (२४ मे…
आजचे राशीभविष्य ## मेष आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अतिशय मजबूत आणि प्रगतीकारक ठरेल. घरासाठी काही मोठ्या आणि सुखसोयींच्या वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला मोठे सौख्य लाभेल आणि समाजात तुमचा प्रभाव वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या विषयांवर वरिष्ठांशी चर्चा होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या आणि आज लांबचा प्रवास करणे शक्यतो टाळा. ## वृषभ नवीन वास्तू किंवा घर खरेदी करण्याची तुमची जुनी इच्छा आज पूर्ण होऊ शकते. मुलांच्या प्रगतीच्या किंवा नोकरीच्या चांगल्या बातम्या मिळाल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. बऱ्याच काळापासून सतावणारी आरोग्य समस्या दूर झाल्यामुळे तुम्हाला मानसिक दिलासा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सन्मान राखण्याच्या उद्देशाने शिवसेना महायुती सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. “मॅनहोलकडून मशीनहोलकडे” या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत संगमनेर नगरपरिषदेला शहराच्या स्वच्छतेसाठी १ कोटी रुपये किमतीचे अत्याधुनिक वाहनयुक्त सक्शन व जेटिंग मशीन प्रदान करण्यात आले आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि माध्यमातून हे मशीन उपलब्ध झाल असल्याची व या नव्या सुविधेमुळे संगमनेर नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहिमेला आता एक नवी दिशा मिळणार असल्याची माहिती नगरसेवक साक्षी सूर्यवंशी यांनी दिली. या आधुनिक यंत्रणेच्या उपलब्धतेमुळे आता हाताने मैला उचलण्याच्या अमानवी प्रथेला पूर्णविराम मिळणार असून, सफाई कर्मचाऱ्यांच्या जीविताचे संरक्षण होण्यास मोठी मदत होणार आहे. यामुळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर : संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून राज्याला परिचित आहे मात्र मागील दीड वर्षापासून तालुक्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून विकास कामे करणे ऐवजी नवीन लोकप्रतिनिधी यांनी सुरळीत सुरू असलेल्या आरटीओ कॅम्पमध्ये फोटोसेशन हे स्टंटबाजीसाठी केली असल्याची टीका पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी केली आहे. नवीन लोकप्रतिनिधीच्या स्टंटबाजीवर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब गायकवाड व निलेश थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यामध्ये अनेक वाड्यावर त्यावर सध्या पाण्याची वणवण आहे. यावर नवीन लोकप्रतिनिधी काही बोलत नाही. मागील ४० वर्षांमध्ये हा तालुका विकास कामांमधून उभा राहिला मात्र मागील दोन वर्षांमध्ये यांना काहीही करता आले नाही फक्त फोटोसाठी स्टंटबाजी हा…
विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्या आणि अडचणी सोडवण्यासाठी विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी मंगळवारी मुंबईत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीत आ. तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील रखडलेल्या प्रश्नांवर मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आणि तातडीने मार्ग काढण्याची मागणी केली. या भेटीदरम्यान आगामी २१ मे रोजी शिक्षण आयुक्तांसोबत होणाऱ्या विशेष बैठकीच्या नियोजनाबाबतही सविस्तर संवाद झाला. आ. सत्यजीत तांबे यांनी शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्या आणि त्यामुळे शिक्षकांसह शिक्षण क्षेत्राला भेडसावणाऱ्या अडचणी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. या सर्व न्याय्य मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी २५…
