सोमवार, दिनांक १० जून २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकारी केंद्रीय मंत्र्यांचा रविवारी शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात केरळमधील भाजपाचे एकमेव व पहिलेच खासदार सुरेश गोपी यांनी देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. काल केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या गोपी यांनी आज मंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोण आहेत सुरेश गोपी… २०२२ पर्यंत राज्यसभेवर खासदार असलेले सुरेश गोपी लोकसभा निवडणुकीत त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा पराभव करुन निवडून आले आहेत. केरळमधून निवडून येणारे ते भाजपचे पहिले खासदार ठरले आहे. त्यामुळे त्यांना मोदींच्या एनडीए सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाची संधी देखील मिळाली.
यासाठी मंत्रीपद सोडण्याची तयारी… सुरेश गोपी हे चित्रपट अभिनेते असून त्यांनी अनेक चित्रपट साईन केल्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी व पूर्ण वेळ खासदार म्हणून काम करण्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्रीपद सोडण्याची तयारी एका प्रादेशिक वृत्तवाहिनीशी बोलताना दर्शविली असल्याचे समोर येत आहे.
गोपी म्हणतात… मी मंत्रीपद मागितले नव्हते. मला खासदार म्हणून काम करावयाचे आहे. मंत्रीपदाची आवश्यकता नाही असे मी सांगितलं होतं. त्यामुळे लवकरच मी या पदावरून मुक्त होईल, असे मला वाटते. त्रिशुराच्या मतदारांनाही काही अडचण नाही मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या अर्धवट सेमी पूर्ण करावयाचे आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले.


