Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आयोगाकडून निवडणुकीच्या तारखेचा सस्पेन्स कायम, कमी मतदानाबद्दल केली चिंता व्यक्त; दौऱ्यात ११ पक्षांच्या नेत्यांबरोबर केली चर्चा विधानसभा निवडणूक तयारीची पत्रकार परिषदेत दिली माहिती
निवडणूक

आयोगाकडून निवडणुकीच्या तारखेचा सस्पेन्स कायम, कमी मतदानाबद्दल केली चिंता व्यक्त; दौऱ्यात ११ पक्षांच्या नेत्यांबरोबर केली चर्चा विधानसभा निवडणूक तयारीची पत्रकार परिषदेत दिली माहिती

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/09/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २८ सप्टेंबर

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ११ पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. शिवाय राज्यातल्या निवडणूक तयारीचा आढावाही घेतला. राज्यात २८८ विधानसभा मतदार संघ असून निवडणुकीला जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी आयोगाचे प्रयत्न असल्याचे सांगत शहरी भागात होत असलेल्या कमी मतदानाबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी चिंता व्यक्त केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती मात्र, पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली नाही. निवडणुकीसंबंधी घोषणा लवकरच पत्रकार परिषदेतूनच करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात पुरुष मतदारांची संख्या ४ कोटी ९५ लाख तर महिला मतदारांची संख्याही ४ कोटी ६४ लाख आहे. तृतीयपंथी ५ हजार ९९७, तर दिव्यांग मतदारांची संख्या ६ लाख ३२ हजार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा मतदान करणारे मतदार १९ लाख ४८ हजार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

या निवडणुकीत सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाणार आहे. तशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. खोटे व्हिडीओ पसरवले जातात. त्यावरही लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीत सभा स्थळावरून वाद होत असतात. त्यामुळे जो पहिला अर्ज करेल त्याला सभेचे ठिकाण द्यावे असेही सांगण्यात आल्याचं आयोगाने स्पष्ट केले. शिवाय गुन्हेगारी प्रवृत्तीचा उमेदवार असेल तर त्याची माहिती वर्तमान पत्रातून एकदा नाही तर तीन-तीन वेळा द्यावी लागेल असेही राजीव कुमार यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकी दरम्यान ४ हजार कोटीचे ड्रग्ज सापडले होते. त्यामुळे या सर्व गोष्टींवर तपास यंत्रणाचेही लक्ष रहाणार आहे. प्रचारादरम्यान जर कोणी विमान किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करत असेल अशा वेळी काही तपासणी करायची असल्यास त्याचीही मुभा राहील असे ते म्हणाले.

दरम्यान पक्षीय चिन्ह वाटपाचा वाद सध्या कोर्टात असल्याने त्यावर बोलणे निवडणूक आयुक्तांनी टाळले. मतदानाच्या दिवशी प्रत्येकाला मतदान करता येईल याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सुचना करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निवडणूक किती टप्प्यात होईल हे लवकरच घोषीत केली जाईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका कधी होणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 707
निवडणूक निवडणूक आयोग राजीव कुमार विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा (MACCIA) निवडणूक निकाल जाहीर: अहिल्यानगर जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड, पाहा राज्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी!

17/06/2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

रविवार विशेष लेख — पश्चिम बंगाल बंगालच्या विजयाचे मानकरी

10/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

By Annant Ppangarkar29/08/20260

Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना…

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.