शनिवार २३ नोव्हेंबर – मुंबई
विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. पाठोपाठ राज्यात महायुती सरकारने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. अहमदनगर जिल्ह्यातही महायुतीच्या दिशेने कल हेच धक्कादायक निकाल समोर आले आहे.
जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने प्रत्येकी चार-चार तर शिवसेना शिंदे गटाने दोन जागांवर विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या दोन्ही जागांवर दिलेले भाजपचे उमेदवार निवडून आले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला प्रत्येकी एकेका जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जिल्ह्यात एकही जागा मिळू शकली नाही.
निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल मध्ये देखील महायुती सत्ता स्थापन करेल असे भाकीत करण्यात आले होते मात्र एक्झिट पोलने व्यक्त केलेल्या अंदाज अपेक्षाही जास्त जागांवर महायुतीतील घटक पक्षांचा विजय झाला आहे.
राज्यातील निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निकाला संदर्भात एक ट्विट केलेले असून त्यामध्ये ,’ अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…’ असे म्हटलेले आहे. निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.
अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…
— Raj Thackeray (@RajThackeray) November 23, 2024




