शिर्डी – विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तीन ते चार महिन्यात होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे बाकी आहे. तो निर्णय आल्यानंतर या निवडणुका होतील. विधानसभेत विजय मिळवला, आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतसुद्धा विजय मिळवायचा आहे, असे फडणवीस म्हणाले.
‘श्रद्धा आणि सबुरी’चा मंत्र भाजपसाठी महत्वाचा आहे. ज्यांना ‘श्रद्धा आणि सबुरी’चा अर्थ समजला नाही त्यांची हालत बुरी झाली, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपला विजय मिळाला असल्याचे म्हणत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
यावेळी फडणवीस यांनी महाभारतातील गोष्ट सांगत नरेंद्र मोदी यांना माधव आणि मतदारांना केशव अशी उपमा दिली. या केशव आणि माधव यांच्यामुळे आपल्याला निवडणुकीच्या युद्धात विजय मिळाला, असे ते म्हणाले.