राज ठाकरेंच्या तिरकस सवालाने राष्ट्रवादी हैराण, राज यांच्या बदलत्या भूमिकेचा महाराष्ट्र साक्षी
फक्त १.५५ टक्के मतं मिळालेल्या मनसेवर पक्ष चिन्ह रेल्वे इंजिन जातंय की काय? अशी परिस्थिती उद्भवली आहे.
विशेष प्रतिनिधी / मुंबई
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केला. मात्र, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी समर्थन दिलं. विधानसभेत महायुतीत येणार की नाही, अशी गोंधळलेली स्थिती मनसेची झाली होती. महाराष्ट्रातील जनतेशी नाळ जोडून लोकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला. पण मनसे कायम ऋतूप्रमाणे आपली भूमिका बदलताना दिसली. अशा गोंधळलेल्या अवस्थेमुळेच महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेवर कधी विश्वास बसला नाही, असं परांजपे म्हणाले.
भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “राज ठाकरे हे जो नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, तो अर्धवट माहितीच्या आधारे आहे. राज ठाकरे हे जे सांगू पाहत आहेत, त्याचं उत्तर एकच आहे की, आम्ही राष्ट्रनिर्माण करताना राष्ट्रीय पक्ष म्हणून कधीही तडजोड केली नाही.
एक भारत श्रेष्ठ भारत, पोखरण, एनआरसी, सीएए यासारख्या विषयावर भाजपानं कधीही तडजोड केली नाही. मात्र, वेळ, काळ आणि राजकीय परिस्थिती पाहून सरकार चालविताना जे तत्कालिक घडते, त्याचा राज ठाकरे हे एक अर्थ लावून निरुपण करु पाहत आहेत. ते जे नरेटिव्ह सेट करु पाहत आहेत, ते महाराष्ट्राच्या जनतेला पटत नाही. फक्त १.५५ टक्के मतं मिळालेल्या मनसेवर पक्ष चिन्ह रेल्वे इंजिन जातंय की काय? अशी परिस्थिती उद्भवली आहे.
“महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा कशा मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल, आपले कार्यकर्ते, पदाधिकारी कसे टिकतील यावर चिंतन करावं,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी राज ठाकरे यांना लगावला. “राज ठाकरे हे एक नरेटिव्ह सेट करु पाहत आहेत. मात्र, तो जनतेला कधी पटणार नाही,” अशी बोचरी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.
