
संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी
बौद्ध धर्मीयांचे महाविहार, लेणी, दीक्षाभूमी ही ठिकाणे बौद्धांच्या ताब्यात नसून ही सर्व बौद्ध स्थळे भारतीय बौद्ध महासंघ राष्ट्रीय संस्थेच्या ताब्यात देण्यात यावी. बौद्ध गया मंदिर अधिनियम १९४९ रद्द करावा, या मागणीसाठी येथील वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मंगळवारी दुपारी हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उत्कर्षाताई रुपवते, चंद्रकांत पवार, राजू मुन्तोडे, रामदास भालेराव, एकनाथ मेढे, अशोक गायकवाड, रवींद्र भालेराव, विशाल रुपवते, संगिता मिसाळ, शकुंतला जाधव, गौतम रोहम, संध्या खरे, सुनिता भालेराव, वैभव मोकळ आदी उपस्थित होते.

यावेळी उत्कर्षा रुपवते म्हणाल्या, अशोक सम्राट यांनी ८४ हजार स्तुप बांधले. यात अनेक बौद्ध विहार लेण्या आहे. प्रत्येक मंदिरे त्या-त्या धर्माच्या ताब्यात आहे. परंतु बौद्ध धर्माचे महाविहार लेण्या बौद्धांच्या ताब्यात नसून ब्राम्हणांच्या ताब्यात आहे. बोध गया विहार दीक्षाभूमी नागपूर, असे अनेक बौद्ध स्थळे ब्राम्हणांच्या ताब्यात आहे. तसेच बोध गया मंदिर अधिनियम १९४९ रद्द करण्यात यावा.
बौद्धांची सर्व बौद्ध स्थळे ही भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय संस्थेच्या ताब्यात देण्यात यावी. परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या खूनाचा तपास करून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. छात्रभारतीचे कार्यकर्त्यांना करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या केल्या. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाच्यावतीने अधिकाऱ्यांनी स्वीकारले.


