महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
कुंभार समाजाच्या वीट व्यवसायावरील प्रदूषणाची अट सरकारने रद्द केली आहे त्याचप्रमाणे, भविष्यात बिगरशेतीची अट रद्द करून अवकाळी पावसाने वीट व्यवसायाचे नुकसान झाल्यास विमा योजना लागू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी कुंभार समाज बांधवांना दिला.

संत गोरोबाकाका पुण्यतिथी निमित्त कुंभार गल्लीतील गोरोबाकाका मंदिरात आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, कुंभार समाज संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र जोर्वेकर, उपाध्यक्ष राजेंद्र जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, दिलीप वाकचौरे, मधू नालकर, अनिल जोर्वेकर, पंकज जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, संजय वाकचौरे, निलेश खुळे, रामदास मेहेत्रे, शशिकांत घोलप, सचिन पावबाके, सुभाष जोर्वेकर, महेंद्र वाकचौरे, नंदू जोर्वेकर, संकेत खुळे, अजित भालेराव, योगेश सूर्यवंशी, जालिंदर जोर्वेकर, अभिराज वाकचौरे आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले, “कुंभार समाजातील तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे काम संत गोरोबाकाकांनी केले आहे. त्यांचे विचार आणि संस्कार प्रत्येक समाजबांधवाने आपल्या आचरणात आणावेत. कुंभार समाजबांधवांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करू.”
यावेळी कुंभार समाजाच्यावतीने माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, कुंभार समाजाचे अध्यक्ष मच्छिंद्र जोर्वेकर आणि उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी आमदार खताळ यांचा सत्कार केला.


