संगमनेर, प्रतिनिधी:
रस्त्याच्या बाजूपट्ट्यावर अतिक्रमण करून विनापरवाना संरक्षक भिंत आणि पाण्याच्या टाकीचे बांधकाम केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोल्याच्या उप अभियंत्यांनी चंदनापुरी (संगमनेर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना एका नोटीसद्वारे चांगलाच दणका देत सात दिवसाच्या आत अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश बजावले आहे.
शाळेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या अतिक्रमणाविरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. या रस्त्यावर ४/४०० ते ५/४०० किलोमीटर दरम्यान झालेल्या बेकायदेशीर बांधकामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणधारकांना ही नोटीस बजावली असून, नोटीसच्या माध्यमातून ही अतिक्रमणे तातडीने काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
या संदर्भात उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. २, अकोले यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार, चंदनापुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम आणि पाण्याच्या टाकीचे बांधकाम रस्त्याच्या बाजूवर, विभागाच्या परवानगीशिवाय करण्यात आले आहे. यामुळे रस्त्याची बाजूपट्टी पूर्णपणे अडविण्यात आली असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित बांधकाम धारकांनी सात दिवसांच्या आत ही अतिक्रमणे स्वतः काढून टाकावीत. अन्यथा, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ती काढून टाकण्यात येईल आणि त्याचा खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाईल. तसेच, संरक्षक भिंतीचे बांधकाम न काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
या पत्राची प्रत संगमनेर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी व गटविकास अधिकारी, चंदनापुरी ग्रामपंचायतचे सरपंच, संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिक्रमण करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेला दणका: रस्त्यावरील अतिक्रमण ७ दिवसात काढण्याचे आदेश
यामुळे रस्त्याची बाजूपट्टी पूर्णपणे अडविण्यात आली असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.



शाळेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या
या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की,
