संगमनेर, प्रतिनिधी:
भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात मे आणि जून महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाण्याची चांगली उपलब्धता आहे, यामुळे नदीमार्गे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, याच्या उलट परिस्थिती निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात आहे, लाभक्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. ही बाब लक्षात घेऊन, निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांमधून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते आणि माजी जलसंपदामंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्र्यांना लिहिलेले पत्र चर्चेत आले असून आपल्या पत्रात थोरात यांनी म्हटले आहे की, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक समाधानकारक आहे आणि मोठ्या प्रमाणात विसर्ग नदीमार्गे सुरू आहे. याउलट, निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र पर्जन्यछायेखाली येत असल्याने तिथे अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागात शेतीसाठी आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या कायम आहे. हा विरोधाभास लक्षात घेता, निळवंडे धरणातील अतिरिक्त (ओव्हरफ्लो) पाणी तातडीने डाव्या आणि उजव्या कालव्यांमधून सोडणे अत्यंत आवश्यक असल्याचे थोरात यांनी अधोरेखित केले.
थोरात यांच्या मते, या दुष्काळी पट्ट्यात आताच पाणी सोडल्यास ते अडवले जाईल आणि जमिनीत जिरवले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती सिंचनाखाली येईल आणि शेतकऱ्यांना वर्षभर त्याचा फायदा मिळेल. त्यामुळे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासूनही थोरात यांनी कालव्यांमधून पाणी सोडण्याची मागणी केली होती आणि त्यावेळी प्रशासनाने पाणी सोडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता. दुष्काळी भागातील 182 गावांना सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी बाळासाहेब थोरात यांनीच या धरणाची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात ते नेहमीच मदतीला धावून आल्याचे सर्वश्रुत आहे. या मागणीमुळे निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लिहिले पत्र, पहा काय केली विनंती; थोरातांचे पत्र चर्चेत!
गेल्या दोन वर्षांपासूनही थोरात यांनी कालव्यांमधून पाणी सोडण्याची मागणी केली होती आणि त्यावेळी प्रशासनाने पाणी सोडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता.



माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्र्यांना लिहिलेले पत्र चर्चेत आले असून
गेल्या दोन वर्षांपासूनही थोरात यांनी कालव्यांमधून
