संगमनेर –
संगमनेर शहरात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा झाला. या गणेशोत्सवाचा समारोप एकविरा फाऊंडेशनच्या साडेपाचशे युवा स्वयंसेवकांनी केलेल्या मदतीमुळे अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक झाला. डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली या युवक-युवतींनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांना मदत केली आणि प्रवरा नदीकाठची स्वच्छता करून निर्माल्य संकलन केले.
या उपक्रमासाठी एकविरा फाऊंडेशन आणि संगमनेर नगरपालिका यांनी संयुक्तपणे प्रवरा नदीकाठी विशेष व्यवस्था केली होती. यावेळी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीही गणेश विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला.
डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साडेपाचशे युवक-युवतींनी नागरिकांना विसर्जनासाठी मदत केली आणि प्रवरा तसेच म्हाळुंगी नदीकाठी जमा झालेले निर्माल्य गोळा केले. पन्नास-पन्नासच्या गटांमध्ये विभागून या स्वयंसेवकांनी आलेल्या भाविकांना पुराची माहिती दिली आणि निर्माल्य योग्य ठिकाणी जमा करण्याचे आवाहन केले.
याबद्दल बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, गेल्या सात वर्षांपासून एकविरा फाऊंडेशन हा उपक्रम राबवत आहे, तो खूप अभिमानास्पद आहे. यामध्ये अनेक तरुण स्वतःहून सहभागी होतात आणि नागरिकांना मदत करतात. यामुळे गणेश विसर्जन सुरक्षितपणे पार पडते.
आमदार सत्यजित तांबे यांनीही या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘एकविराचे सदस्य गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी नदीकाठी सेवा देत आहेत. थोरात साखर कारखान्याने यांत्रिक मदत पुरवून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी मोठी मदत केली आहे.’
डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले की, बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाऊंडेशन महिला सबलीकरणासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही नेहमीच पुढे असते. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे नद्यांना भरपूर पाणी आहे. निर्माल्यमुळे होणारी अस्वच्छता आणि त्यातून वाढणारी रोगराई टाळण्यासाठी हे स्वच्छता अभियान राबवले जात आहे.
यावर्षी, प्रवरा नदीतील पाण्याचा अंदाज घेऊन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने गणेश विसर्जनासाठी कन्हेअरची व्यवस्था केली. यामुळे भाविकांना गणपतीचे विसर्जन करणे सोपे आणि सुरक्षित झाले. नदीकाठी सुरक्षा रक्षक, पोहणारे तरुण आणि आरतीची व्यवस्थाही करण्यात आली होती. या संपूर्ण कामासाठी संगमनेर नगरपालिकेनेही मोठे सहकार्य केले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.



संगमनेर –
याबद्दल बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की,
