मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर शुक्रवारी सायंकाळी टेंभुर्णी बायपासवर खड्ड्यांमुळे अचानक फुटले. सुदैवाने, धाराशिव येथील शासकीय गाडीवरील चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला आणि डॉ. गोऱ्हे सुखरूप आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती तुमच्या कार्यालयाचे कार्यालयीन अधिकारी योगेश जाधव यांनी दिली.
सोलापूरहून पुण्याकडे जात असताना ही घटना घडली. टेंभुर्णीच्या बायपास मार्गावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवास करताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. डॉ. गोऱ्हे यांच्या गाडीपाठोपाठ प्रवास करणाऱ्या आणखी दोन वाहनांचेही टायर त्याच परिसरात फुटल्याने या रस्त्याच्या गंभीर स्थितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. हे खड्डे लोकांच्या जीवावर बेतत असून ते तातडीने बुजविण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांचे आणि प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ नयेत म्हणून त्वरित कारवाई करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अपघातानंतर डॉ. गोऱ्हे यांनी स्वतः परिसरातील परिस्थितीची पाहणी केली. रस्ते खराब असल्याने अनेक वाहनांचे नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश दिले.
डॉ. गोऱ्हे यांनी रस्त्याच्या समस्येची दखल घेऊन तत्काळ पाऊले उचलल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आभार मानले आहेत.
खड्ड्यांमुळे विधान परिषदेच्या उपसभापतींच्या वाहनाचे टायर फुटले; डॉ. नीलम गोऱ्हे सुखरूप, तातडीने खड्डे बुजविण्याचे निर्देश
त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती तुमच्या कार्यालयाचे कार्यालयीन अधिकारी योगेश जाधव यांनी दिली.



मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर शुक्रवारी सायंकाळी टेंभुर्णी बायपासवर खड्ड्यांमुळे अचानक फुटले. सुदैवाने, धाराशिव येथील शासकीय गाडीवरील चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला आणि डॉ. गोऱ्हे सुखरूप आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती तुमच्या कार्यालयाचे कार्यालयीन अधिकारी योगेश जाधव यांनी दिली.
या घटनेची गंभीर दखल घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांचे आणि प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ नयेत म्हणून त्वरित कारवाई करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. गोऱ्हे यांनी रस्त्याच्या समस्येची दखल घेऊन तत्काळ पाऊले उचलल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आभार मानले आहेत.