आश्वी | प्रतिनिधी
निळवंडे धरणाचा उजवा कॅनॉल पावसाच्या प्रचंड पाण्यामुळे राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे शनिवारी रात्री फुटला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी धास्ती पसरली आहे.
कॅनॉलची भिंत फुटल्याने पाण्याचा प्रवाह वडनेरकडे वळला. सुदैवाने, या घटनेत निंभेरे येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान टळले असून, कोणतीही मानवी हानी झालेली नाही. मात्र, या प्रकाराने ग्रामस्थ हादरले असून भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कॅनॉलची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या घटनेनंतर घटनास्थळी सरपंच शांताराम सिनारे, माजी सभापती भीमराज हरदे, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू सिनारे, कामगार पोलीस पाटील बाळकृष्ण हारदे, सचिव माधव हारदे, शहाजी हारदे, राजेंद्र हारदे, चांगदेव हारदे, गोरख साबळे, तसेच कॉन्ट्रॅक्टर चोपडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थित ग्रामस्थांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे कॅनॉलची तातडीने व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याचा ताण वाढत आहे. कॅनॉल फुटल्याच्या घटनेमुळे ग्रामस्थांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. भविष्यात याहून गंभीर घटना घडू नयेत, यासाठी संबंधित जलसंपदा विभागाने वेळीच उपाययोजना करून कॅनॉलच्या बांधकामाची गुणवत्ता तपासावी आणि आवश्यक दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी निंभेरे ग्रामस्थांकडून होत आहे. कॅनॉलच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून काय पाऊले उचलली जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
निळवंडे धरणाचा उजवा कॅनॉल फुटला: पावसाच्या तडाख्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
कॅनॉलच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून काय पाऊले उचलली जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





या घटनेनंतर घटनास्थळी सरपंच
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे धरणातील