

शिर्डी- महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीचे आतोनात नुकसान झाले असून घरे व मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले आहे. या कठीण परिस्थितीत, आपली सामाजिक बांधिलकी जपत, शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची भरघोस मदत जाहीर केली आहे.
संस्थानच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या राज्यातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. साईबाबा संस्थानने नेहमीच धर्मदाय आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि त्यांच्या या उदार मदतीमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या पीडितांना तातडीची मदत पुरवण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला बळ मिळेल.
श्री साईबाबा संस्थान केवळ एक धार्मिक केंद्र नसून, ते मानवतेच्या आणि सेवेच्या मूल्यांचे प्रतीक आहे. संस्थान नेहमीच आरोग्य सेवा, शिक्षण, आणि नैसर्गिक आपत्त्यांमध्ये गरजू लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असते. यापूर्वीही, संस्थानने अनेक वेळा राज्याला आणि देशाला आवश्यक असलेल्या कठीण प्रसंगी मोठी आर्थिक मदत केली आहे.
साईबाबांच्या भक्तांनी दिलेल्या देणगीतून संस्थान सामाजिक कार्यात योगदान देत आहे. संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ही रक्कम लवकरच सुपूर्द केली जाईल.



संस्थानच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या
श्री साईबाबा संस्थान केवळ एक धार्मिक केंद्र नसून,