Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांचे अवकाळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान; शासनाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी
नैसर्गिक आपत्ती

संगमनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांचे अवकाळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान; शासनाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी

या गंभीर विषयाची दखल घेत त्वरित मदत मिळावी, यासाठी वीट उत्पादक संघ संगमनेर-अकोलेचे अध्यक्ष कैलास वाकचौरे, तसेच राजू जोर्वेकर, मच्छिंद्र जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, अनिल जोर्वेकर, दिगंबर जोर्वेकर आणि विशाल सोनवणे यांच्यासह सर्व वीट उत्पादकांनी शासनाकडे साकडे घातले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांवर सध्या दुहेरी संकट ओढवले असून, माती, राख, कोळसा आणि भुसा यांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ यामुळे हा व्यवसाय आधीच आर्थिक तोट्यात गेला आहे. तर दुसरीकडे ऐन हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने भट्टीधारकांचे कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या परिस्थितीत शासनाने तातडीने नुकसानग्रस्त वीटभट्ट्यांचे पंचनामे करून व्यावसायिकांना भरपाई द्यावी, अशी मागणी वीट उत्पादक संघ, संगमनेर-अकोले यांच्या वतीने करण्यात आली आहे.
वीटभट्टी व्यवसायाला अद्याप कोणतीही विमा योजना लागू नाही. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक वर्षांपासून सरकार दरबारी पाठपुरावा करूनही अद्याप कोणत्याही सरकारने या मागणीची दखल घेतलेली नाही. विमा कंपन्यांकडे दाद मागितली असता, त्यांनीही हा विषय शासनाच्या अखत्यारीत असल्याचे सांगून हात झटकले आहेत.
वीटभट्टी व्यावसायिकांना शेतीप्रमाणेच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळणे आवश्यक आहे, मात्र शासन आणि विमा कंपन्या एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळत असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, कुंभार समाजाला मातीवरील ५०० ब्रासपर्यंतची रॉयल्टी माफ असताना, संगमनेरातील वीटभट्टी व्यावसायिकांकडून दरवर्षी १०० ब्रासची रॉयल्टी जबरदस्तीने वसूल केली जाते. शासनाला नियमित कर आणि रॉयल्टी भरूनही, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मात्र संबंधित अधिकारी आणि कर्मचारी पंचनामे करण्याची साधी तसदीही घेत नाहीत. ही अन्यायकारक परिस्थिती असल्याने, शासनाने आतातरी याकडे गांभीर्याने पहावे आणि वीट व्यवसायासाठी विमा योजना लागू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या गंभीर विषयाची दखल घेत त्वरित मदत मिळावी, यासाठी वीट उत्पादक संघ संगमनेर-अकोलेचे अध्यक्ष कैलास वाकचौरे, तसेच राजू जोर्वेकर, मच्छिंद्र जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, अनिल जोर्वेकर, दिगंबर जोर्वेकर आणि विशाल सोनवणे यांच्यासह सर्व वीट उत्पादकांनी शासनाकडे साकडे घातले आहे.
या निवेदनाची प्रत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संगमनेरचे आमदार अमोल खताळ, प्रांत अधिकारी अरुण उंडे आणि संगमनेर-अकोलेचे तहसीलदार यांनाही पाठवण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 598
कैलास वाकचौरे मदत विमा वीट व्यावसायिक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात सततच्या भीज पावसामुळे मोठे नुकसान; सावरगावतळ येथे तीन घरे कोसळली, शेती पिकेही धोक्यात

08/07/2026

अतिवृष्टीचा इशारा: अकोले तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

07/07/2026

सत्ताधाऱ्यांकडून संगमनेरच्या शेतकऱ्यांचा विश्वासघात; इतिहासात प्रथमच तालुक्याला ‘शून्य’ टक्के पीक विमा

08/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : नागरिकांना आपल्या परिसरातील समस्या आणि अडचणी थेट…

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.