संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 3200 रुपये भाव देणार आहे. विक्रमी ऊस भावाची घोषणा करतानाच राज्य सरकारचे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी, राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत, त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी. याचबरोबर, पंजाब सरकारप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 2025-26 च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ आज (सोमवारी, ६ ऑक्टोंबर) उत्साहात पार पडला. यावेळी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, थोरात सहकारी साखर कारखान्याने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आधारित काटकसर, अचूकता आणि पारदर्शक निर्णय घेत कायम चांगली वाटचाल केली आहे. साखर कारखानदारीत मोठी स्पर्धा असून, उसाची पळवापळवी होणार असली तरी, यावर्षी थोरात कारखाना प्रति टन 3200 रुपये भाव देणार आहे. कारखान्याला दरवर्षी किमान नऊ लाख मेट्रिक टन गाळप करणे आवश्यक आहे, मात्र कारखान्याने 15 लाख मेट्रिक टनापर्यंत गाळप करण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे.
कार्यक्षेत्रातील व बाहेरील सभासद आणि ऊस उत्पादकांचा कारखान्यावर मोठा विश्वास असल्याचे थोरात यांनी नमूद केले. आगामी काळात कार्यक्षेत्रामध्ये एकरी उत्पादन वाढविणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट करत संगमनेर आणि अकोले तालुक्यात सततच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आपण मंत्री असताना 2005-06 मध्ये जशी मदत केली होती, तशी मदत आता सरकारने करावी, असेही ते म्हणाले.
तालुका सततच्या विकास कामातून वैभवशाली बनवला आहे. आज सर्व क्षेत्रांमध्ये संगमनेरचे नाव अग्रगण्य आहे, मात्र काही लोक तालुक्याला बदनाम करत असून, खोट्या केसेस टाकून बाहेरच्या संदेशावर काम करत आहेत, अशी खंत व्यक्त केली. नुसते फ्लेक्स लावण्याऐवजी मदत करा, असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला. तालुक्यातील विकासाची वाटचाल कायम ठेवण्यासाठी आपल्यातील मतभेद दूर करावेत. आपण धार्मिक आहोत, हिंदूधर्मीय आहोत, परंतु इतर धर्माचा द्वेष करत नाही. मानवता हा धर्म घेऊन आपण चालत आहोत. सर्वांनी तालुक्याची वाटचाल जपण्यासाठी कटिबद्ध रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
- माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्याला दिशादर्शक असे कारखान्याचे काम सुरू असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम चांगले निर्णय घेतले जातात. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीवर हा कारखाना देशातील कारखान्यांसाठी आदर्शवत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, निर्मला राऊत, संतोष हासे, संपतराव गोडगे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, सतीश वर्पे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजने, दिलीप नागरे, लताताई गायकर, सुंदरबाई डूबे, बंडू नाना भाबड, मदन आंबरे, राजेंद्र चकोर, नानासाहेब शिंदे, सुरेश थोरात, शांताराम कढणे, नवनाथ आंधळे, विष्णुपंत रहाटळ, विठ्ठल असावा, सिताराम वर्पे, सेक्रेटरी किरण कानवडे यांच्यासह सभासद, शेतकरी व ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित होते.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले, तर व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची मोठी घोषणा, थोरात कारखाना देणार प्रतिटन 3200 रुपये ऊस भाव; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या कर्जासह हेक्टरी 50 हजाराची मदत सरकारने देण्याची केली मागणी!
आज सर्व क्षेत्रांमध्ये संगमनेरचे नाव अग्रगण्य आहे, मात्र काही लोक तालुक्याला बदनाम करत असून, खोट्या केसेस टाकून बाहेरच्या संदेशावर काम करत आहेत, अशी खंत व्यक्त केली. नुसते फ्लेक्स लावण्याऐवजी मदत करा, असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला.



संगमनेर – 
थोरात म्हणाले,
तालुका सततच्या विकास कामातून वैभवशाली बनवला आहे.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक