मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णतः पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. मतदार याद्यांमध्ये असलेल्या गंभीर त्रुटींवर यावेळी आयोगाचे लक्ष वेधण्यात आले.
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, मतदार यादीत लाखो बनावट नावे समाविष्ट असल्याचे आणि अनेक पत्ते प्रत्यक्षात अस्तित्वात नसतानाही त्या ठिकाणी मतदार नोंदवले गेल्याच्या गंभीर त्रुटी शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या अनियमिततेचे ठोस पुरावे लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
या पार्श्वभूमीवर, तांत्रिक साधनांचा वापर करून दुबार मतदार व संशयास्पद नोंदींची तत्काळ छाननी करावी, या त्रुटी त्वरित दुरुस्त करून मतदार यादी अचूक करावी, अशी मागणी नेत्यांनी केली. निवडणुका निष्पक्ष व विश्वासार्ह पद्धतीने घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने व ठोस पाऊले उचलावीत, अशी सर्वानुमते मागणी यावेळी करण्यात आली.
या महत्त्वाच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार जयंत पाटील, मुंबई कॉंग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार जयंत पाटील (शेकाप), खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रईस शेख, आमदार आदित्य ठाकरे, कॉ. प्रकाश रेड्डी यांच्यासह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी होते.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता आणण्यासाठी महाविकास आघाडी व सहयोगी पक्षांची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
या अनियमिततेचे ठोस पुरावे लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.



मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णतः पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. मतदार याद्यांमध्ये असलेल्या गंभीर त्रुटींवर यावेळी आयोगाचे लक्ष वेधण्यात आले.
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, मतदार यादीत लाखो बनावट नावे समाविष्ट असल्याचे आणि अनेक पत्ते प्रत्यक्षात अस्तित्वात नसतानाही त्या ठिकाणी मतदार नोंदवले गेल्याच्या गंभीर त्रुटी शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या अनियमिततेचे ठोस पुरावे लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
या पार्श्वभूमीवर, तांत्रिक साधनांचा वापर करून दुबार मतदार व संशयास्पद नोंदींची तत्काळ छाननी करावी, या त्रुटी त्वरित दुरुस्त करून मतदार यादी अचूक करावी, अशी मागणी नेत्यांनी केली. निवडणुका निष्पक्ष व विश्वासार्ह पद्धतीने घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने व ठोस पाऊले उचलावीत, अशी सर्वानुमते मागणी यावेळी करण्यात आली.